मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – २०१९ च्या लोकसभा डोळ्यासमोर ठेऊन राजकीय नेते सक्रिय झाले आहेत.व एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आरोप करीत आहेत.वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी थेट निवडणूक आयोगालाच धमकी दिली. सत्ता आल्यास निवडणूक आयोगाला जेलमध्ये टाकू.असं वक्तव्य त्यांनी केलं. पण सत्ता येण्यासाठी किती खासदार लागतात हे तरी प्रकाश आंबेडकरांना माहित आहे का ? असा सवाल भाजप नेते आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.
विनोद तावडे हे राज्याचे शिक्षण मंत्री आहेत. त्यांच्याच शैक्षणिक पात्रतेवर गंभिर आरोप विरोधकानी केले आहेत. त्यांना पदवी दिलेली शिक्षण संस्थांच अस्तित्वात नाही. तेच प्रकाश आंबेडकरांना सत्तेत बसण्यासाठी खासदारांची संख्या माहित नाही. असे म्हणने म्हणजे बुद्धीचा कमकुवत पणा दाखवणे आहे.असे प्रतिउत्तर वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही विनोद तावडेंनी निशाणा साधला आहे. ‘तिहार’ जेल मधील टांगती तलवार शरद पवार यांच्यावर फिरत आहे. महागठवबंधन मी केले असे शरद पवार सांगत आहेत. पण ते झाले आहे का? केजरीवाल. मायावती महागठबंधनात आहेत का ? तिहारच्या टांगत्या तलवारीमुळे शरद पवार प्रचंड अस्वस्थ आहेत.असा घणाघात विनोद तावडे यांनी केला.