मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन माजी कृषीमंत्री (Agriculture Minister) अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांना टार्गेट केलं आहे. दोन लाखांपर्यंत कर्जाचे वन टाईम सेटलमेंट करु, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन म्हणून देऊ अशी घोषणा करुन विधानसभेत टाळ्या मिळवणाऱ्या अर्थमंत्री अजित पवार (ajit pawar) यांचा गजनी (Ghajini) झाला आहे का ? असा सवाल अनिल बोंडे यांनी विचारला आहे.
अजित पवारांची तुलना गजनी चित्रपटाशी
अनिल बोंडे म्हणाले, तुम्हाला गजनी चित्रपट आठवतो का ?
गजनी सर्व काही विसरायचा… असे म्हणत अजित पवार (ajit pawar) यांनी गजनी चित्रपटातील अमीर खानशी (Aamir Khan) तुलना केली आहे.
राज्यातील ठाकरे सरकारने (Thackeray government) पीक विमा (insurance) कंपन्यांशी करार करताना निकष बदलले.
यामुळे शेतकऱ्यांचे 4 हजार 234 कोटी रुपयांचे नुकसान झाले, असा आरोप अनिल बोंडे यांनी केला.
याशिवाय राज्याच्या कृषीमंत्र्यांनी राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी बोंडे यांनी केली.
खासगी विमा कंपन्यांच्या घशात शेतकऱ्यांचे पैसे
अनिल बोंडे यांनी सांगितले की, 2019 च्या खरीप हंगामामध्ये 1 कोटी 28 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता.
त्यावेळी तब्बल 85 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी 5 हजार 795 कोटी रुपये मिळाले होते.
दुसरीकडे 2020 च्या खरीप हंगामात 1 कोटी 38 लाख शेतकऱ्यांनी पिक विमा काढला.
परंतु 15 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी केवळ 94 कोटी रुपये मिळले आहेत.
त्यामुळे खासगी विमा कंपन्यांच्या घशात राज्याच्या शेतकऱ्यांच्या हक्काचे 4 हजार 234 कोटी रुपये ठाकरे सरकारच्या चुकीमुळे गेल्याचा आरोप बोंडे यांनी केला.
हे दलालांचे सरकार असून त्यांनी विमा कंपन्यांसाठी दलाली केल्याचा आरोप बोंडे यांनी केला.
कृपया हे देखील वाचा:
18 जणांच्या मृत्यूप्रकरणी एसव्हीएस कंपनीचा मालक निकुंज शहाला पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक
‘जेव्हा ठाकरे-मोदी भेटतात, तेव्हा चर्चा तर होणारच’
कामाची गोष्ट ! App बनावट आहे कि Fake? डाउनलोड करण्यापूर्वी ‘हे’ लक्षात ठेवा, अन्यथा…
संतापजनक ! 70 वर्षाच्या नराधमाकडून 10 वर्षाच्या मुलीवर घरात घुसून लैगिंक अत्याचार, कोंढव्यातील घटना