मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील सत्ता संघर्षामुळे २५ वर्षाची भाजपा-शिवसेनेची युती तुटली असल्याने दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहे. ठाकरे सरकारने आरे आणि नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या निर्णय घेतला. यामुळे भाजपा नेते मोहित भारतीय यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. मात्र त्यालाच प्रतिउत्तर देत युवासेनेचे कोअर कमिटीचे सदस्य जय सरपोतदार यांनी मोहित यांना चांगलाच सुनावलं आहे. जय सरपोतदार यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं की, ‘मोहित भारतीय यांना पर्यावरणप्रेमी आणि दहशतवादी यांच्यातील फरक माहित नसावा हे स्पष्ट होतं. तसेच ज्या संधीचा उल्लेख त्यांनी केला. त्याचा फायदा तुम्हीच उचलला पाहिजे, ‘असा टोलाही जय सरपोतदार यांनी लगावला.
दरम्यान , आरे आंदोलकांवरील आणि नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. यावर भाजप नेते मोहित भारतीय यांनी ट्विटरवर पोस्ट टाकत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. मोहित भारतीय यांनी म्हटल की, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊदवरील गुन्हे मागे घेऊन त्याला महाराष्ट्र सरकार लवकर क्लीनचीट देणार आहे. राज्यात गुन्हे मागे घेण्याचं सत्र सुरु आहे. त्वरा करा, काही दिवस शिल्लक आहेत,’ असा टोला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. तसेच महाराष्ट्रात लोकशाहीची अशी अवस्था पाहावयाला मिळत आहे की, विधानसभेत २८८ उमेदवार निवडून येऊनसुद्धा त्यातील एकही मुख्यमंत्री होऊ शकला नाही अशीही टीका त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.
Clearly @mohitbharatiya_ doesn't know the difference between Environmentalist Citizens and terrorists. Infact this is a great opportunity for you, go grab the offer just like you said.#AareyForest @CMOMaharashtra @OfficeofUT @AUThackeray @ShivSena https://t.co/7cg7hsCNdz
— Jay Sarpotdar (@jaysarpotdar) December 3, 2019
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मंत्रालय माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना म्हणाले होते की, आरे कॉलनीत आता जेवढी झाडं राहिली आहेत, ती तशीच राहतील. या झाडांपैकी एकही झाड पडणार नसून त्या झाडांचं पानही कुणी तोडणार नाही, असे म्हणत आरे कारशेडसाठीच्या जंगलतोडीला स्थगिती दिल्याचं सांगितले होते. तसेच आरे आंदोलकांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.
Can @MumbaiPolice Share the list of People who are accused in Aarey . @CMOMaharashtra has withdrawn all cases from tham . The People Accused are related to Christians Missionaries and Communist Party . What is Politics behind this . #MumbaikarsWantToKnow
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) December 2, 2019
Visit : bahujannama.com