पुणे : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिनेमा क्षेत्रातील कलाकारही आरोप-प्रत्यारोपाच्या शर्यतीत मागे नाहीत त्यातच विक्रम गोखले यांनी मत व्यक्त केले आहे ते म्हणाले कि ,माझी बांधिलकी राजकीय पक्षाशी नसून ती शेतकरी, सैनिक आणि सर्वसामान्यांच्या दु:खाशी संबंधित आहे. भारतीय सैन्याचा राजकीय वापर करू नये. असे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले.ते विक्रम गोखले ऍक्टिंग ऍकॅडमीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
काही लोक राजकारणाकडे व्यवसाय म्हणून पाहतात ते अतिशय चुकीचे आहे परंतु बुद्धिजीवी वर्ग सहजासहजी कुठल्याही भूलथापांना बळी पडत नाही त्यामुळे देशातील सुशिक्षित वर्गातील तरूणांनी राजकारणात येण्याची गरज आहे. फक्त भाऊ, दादा आणि साहेब म्हणत राजकारण्यांच्या पाठीमागे जाऊ नका.त्यावर विचार करा
सध्या अनेक अभिनेते राजकारणामध्ये प्रवेश करीत आहे. मात्र, राजकारण समजून घेण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. आत्मचरित्र लिहणार का यावर गोखले म्हणाले कि , “मी आत्मचरित्र लिहिणार नसून सर्व आत्मचरित्र खोटी असतात. असा टोलाही आत्मचरित्र लिहणाऱ्यांना त्यांनी लगावला .