नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – देशातील सातही टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून सगळ्यांचे लक्ष २३ मे कडे लागले आहेत ‘त्यातच वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी त्यांच्या एक्झिट पोलमध्ये एनडीए सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे परंतु काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी एक्झिट पोल आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. निकालाच्या दिवशी स्ट्राँग रूम आणि मतदान केंद्रावर ठाण मांडून बसा ,असं आवाहन काँग्रेस कार्यकर्त्यांना केलं आहे.
अफवा आणि एक्झिट पोल पाहून खचून जाऊ नका. तुम्ही हतबल व्हावं यासाठीच या अफवा पसरविल्या जात आहेत. त्यामुळे तुम्ही सजग राहा. निकालाच्या दिवशी स्ट्राँग रूम आणि मतदान केंद्रावर ठाण मांडून बसा, आपल्या सर्वांना मेहनतीचं फळ निश्चित मिळेल प्रियांका यांनी एका ऑडियो संदेशाच्या माध्यमातून हे आवाहन केलंय.
दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही एक्झिट पोलवरून टीका केली आहे. लोकांची नाळ ओळखण्यात एक्झिट पोल अपयशी ठरले आहेत. असा आरोप चंद्राबाबूंनी केला.