बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील लांबलेल्या 14234 ग्रामपंचायत (Gram Panchayat) निवडणुकांचा (Election) कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे गावखेड्यांमध्ये राजकीय नेत्यांचे दौरे वाढू लागले आहेत. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने गावकऱ्यांना भावनिक साद घातली आहे. प्रत्येक गावाने आपल्या ग्रामपंचायत निवडणुका(Udayan Raje) बिनविरोध करुन प्रशासनाला सहकार्य करावे, अशी साद उदयनराजेंनी घातली आहे.
ग्रामपंचायती या ग्रामविकासाचा पाया समजल्या जातात, तर ग्रामपंचायत निवडणुकीत या लोकशाहीचा पाया समजल्या जातात. आज देखील राज्यातील विविध गावामध्ये निवडणुका सोडल्या तर अन्य बाबतीत गट-तट बाजूला ठेवून यात्रा-जत्रा आणि गावाच्या सर्वांगीण विकासाचे उपक्रम राबवले जातात. ग्रामीण भागातील कष्टकरी व शेतकरी वर्गामुळे अजूनही माणुसकी टिकून आहे.
तथापि कोणत्याही निवडणुका आल्या की, विशेषत: ग्रामीण भागात ईर्ष्या, चढाओढ, मी मोठा की तू मोठा असे म्हणत निवडणुकांदरम्यान घमासान घडून घुमश्चक्री उडते. प्रसंगी संपूर्ण गावास वेठीस धरले जाते. निवडणुकांमध्ये दुभंगलेली मने पुन्हा कधीही जुळून येत नाहीत. त्यामुळे भावकी गावकीत पिढ्यांपिढ्या संघर्ष सुरु राहतो. त्यामुळे गावचा विकासाला मोठ्या प्रमाणावर खीळ बसते. त्यामुळे गावाने आपल्या निवडणुका बिनविरोध कराव्यात, अशी भावनिक साद उदयनराजे यांनी फेसबुकच्या माध्यमातून केली आहे.