मुंबईः बहुजननामा ऑनलाईन – लोकसभेची निवडणूक नुकतिच पार पडल्यानंतर यामध्ये अनेक उमेदवार विजयी झाले तर काही पराभूत झाले. या निवडणूकीमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांना पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. यामुळे कॉंग्रेसमध्ये उमेदवारांची गर्दी खूप वाढली आहे. उमेदवारांच्या अर्जांमध्ये ३४ जिल्ह्यांमधून सुमारे ९०० इच्छुकांनी अर्ज पक्षाकडे प्राप्त केले आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनूसार २९ ते ३१ जुलैदरम्यान प्रत्येक जिल्ह्यात ज्यांनी अर्ज केला आहे त्यांची मुलाखत घेणार असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांनी दिली आहे.
लोकसभा निवडणूकीमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांना विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा असलेल्यांच्या पक्षात गर्दी वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा फक्त एक उमेदवार निवडून आला. बाकी सगळे पराभूत झाले. निवडणूकीच्या तोंडावर राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासारखे आघाडीचे नेते भाजपमध्ये गेले. ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी कॉंग्रेसकडे अर्ज करावेत असे देखील आवाहन करण्यात आले होते. या अर्जासाठी खुल्या वर्गासाठी १५ हजार रुपये, मागासवर्गीयांसाठी १० हजार रुपये जमा करण्यास सांगितले होते. अद्याप दोन जिल्ह्यांची माहिती मिळाली नाही. ३४ जिल्ह्यातून ९०० अर्ज आल्याचे कळत आहे.
अॅड. गणेश पाटील सांगितले की, ज्यांचे अर्ज आले आहे. त्यांच्या जिल्ह्यांमध्ये जाऊन मुलाखत घेण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष यांनी मुलाखतीसाठी प्रत्येक जिल्ह्याकरिता दोन निरीक्षकांची नेमणूक केली आहे. ही मुलाखत २९ ते ३१ जुलैपर्यंत म्हणजेच ३ दिवस घेण्यात येणार आहे. यानंतर या मुलाखतीचा अहवाल कॉंग्रेसकडे पाठविण्याच्या सूचना निरीक्षकांना दिल्या आहेत.