नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीएएवरून केरळमधील वातावरण तापले असून मल्लपुरम येथील खासदार शोभा करंदलाजे यांनी स्वतःवर तक्रार दाखल झाल्यानंतर आक्रमक पवित्रा घेतला आहे. पक्षपाती डाव्या विचारसरणी विरोधात समाजाने एकत्र येण्याची वेळ आली आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच दलित परिवारांसोबत झालेल्या भेदभावानंतर कारवाई करण्याऐवजी त्यांच्यावरच तक्रारी दाखल केल्या जात आहेत. तर या अगोदर शोभा यांची दिशाभूल आणि चुकीची माहिती पसरवल्यावरून तक्रार दाखल करण्यात आली होती.
https://twitter.com/ShobhaBJP/status/1220556370346307584
यांनतर खूपच आक्रमक होऊन शोभा यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली होती. एका ट्विटमध्ये त्यांनी केवळ सरकारचा विजय असो! चेरुकुन्नुमधील दलित कुटुंबावर होणाऱ्या भेदभावाविरुद्ध कारवाई करण्याऐवजी त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे,असे लिहिले आहे. अयशस्वी आणि पक्षपाती डाव्या विचारसरणीवर दबाव आणण्याची वेळ आली आहे, त्यासाठी सर्व समाजाने एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मल्लपुरम येथील मुख्य पोलीस अधिकारी अब्दुल करीम यांनी शोभा करंदलाजे यांच्यावर अनेक वेगवेगळ्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून खासदारांवर सांप्रदायिक शांतता भंग केल्याचा आरोपही करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांमध्ये संशोधन कायद्यानंतर देखील पाण्याची समस्या तशीच असल्याचेही त्यांनी सांगितले. २२ जानेवारी रोजी त्यांनी एक ट्विट करत म्हटले की, मल्लपुरमच्या कुट्टिपुरम येथील हिंदूंनी सीएएचे समर्थन केल्यामुळे त्यांचा पाण्याचा सप्लाय बंद करण्यात आला आहे. यासोबत त्यांनी काही भांड्यांचे फोटो देखील शेअर केले होते.
Visit : bahujannama.com