सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षाचा काळ लोटला, परंतु अजूनही धनगर समाज हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आला नाही. त्यामुळे धनगर समाजातील कर्मचाऱ्यांनी शासकीय, निमशासकीय योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याकरिता प्रयत्न करीत समाजाचा सामाजिक आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य धनगर समाज कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सिद्धारूढ बेडगनूर यांनी केले.
समाज कल्याण सभागृहात जिल्ह्यातील धनगर समाजातील कर्मचाऱ्यांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी बेडगनूर यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी डॉ. दत्तात्रय डांगे, प्रा. देवेंद्र मदने, प्राध्यापक शंभू गावडे, जयवंत हाके, औदप्पा पुजारी, रवी नागिनकेरी, बळीराम ढेरे, जगन्नाथ पैकेकरी, डॉ. वासंती पांढरे, गिरीश सोनटक्के, सुनील बंडगर, सदाशिव माने, शिवाजी कांबळे, भिवा लोकरे, शेखर बंगाळे, अविनाश आलदार, महादेव रुपनवर यांच्यासह जिल्ह्यातील धनगर समाजातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लवकरच संघटनेची शहर-जिल्हा व तालुका निहाय कार्यकारणी गठीत करणार असल्याचेही या सहविचार सभेत ठरविण्यात आले. याप्रसंगी प्राध्यापक देवेंद्र मदने, प्राध्यापक डॉ. दत्तात्रेय डांगे आदींनी मार्गदर्शन केले.