मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे शरद पवार अन भाजप अशीच लढत कायम दिसली आहे. निवडणूक प्रचारा दरम्यान देखील राज्यातील भाजप नेत्यांनी सातत्याने शरद पवार यांना टार्गेट केलं आहे. राष्ट्रावादीचे अनेक दिग्गज नेते फोडून पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्नही करण्यात आला. परंतु, शरद पवारांनी संपूर्ण खेळच पालटत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले आहे. पवारांनी निकालासह आपल्या कृतीतूनही फडणवीसांचे सर्व दावे, आरोप परतावून लावत भाजपला विरोधात बसण्याची वेळ आणली आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवणुकीच्या प्रचारवेळी ‘समोर मल्लच नाही, लढायचं कोणाशी, पवारांच्या राजकारणाचा अस्त झालाय, ईडीची चौकशी तसेच मी पुन्हा येईल असे दावे करत प्रचार गाजवला. राज्यात केवळ भाजपच विजयी होणार अश्या हवेत त्यांनी महाजनादेश यात्रा काढली. मात्र शरद पवारांनी भाजपला खाली खेचत थेट विरोधी बाकडे दाखवले आहे.
तसेच राज्यात आपल्यासमोर लढण्यासाठी विरोधकच नसून भविष्यातील विरोधीपक्ष वंचित असेल असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यामुळे वंचितचादेखील आत्मविश्वास वाढला आणि वंचितनेदेखील आपला मित्रपक्ष असलेल्या एमआयएमला बाजुला सारले. परंतु, पवारांच्या साताऱ्यातील एका भाषणामुळे संपूर्ण हवा पालटल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजप १२३ वरून १०४ वर आला. जरी जास्त जागा आल्या तरी देखील भाजपला विरोधीपक्षात बसण्याची वेळ आली आहे.
Visit : bahujannama.com