मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. ८ नोव्हेंबरला १३व्या विधानसभेचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे तांत्रिक बाब म्हणून देंवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या राज्यपालांकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला.
Mumbai: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis and other state ministers meet Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhawan. pic.twitter.com/grmCMrHLg9
— ANI (@ANI) November 8, 2019
मागील विधानसभेचा कार्यकाळ संपताच नवीन सरकार स्थापन होते. परंतु बहुमत मिळूनही भाजप – शिवसेनेत सत्तास्थापनेवरून वाद सुरु आहे. निकाल लागून १५ दिवस झाले असूनही अद्याप नवीन सरकारचा पत्ता नाही. त्यामुळे मागील कार्यकाळ संपायला काहीच मिनिटे शिल्लक राहिल्याने मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला.
त्यामुळे आता सत्तास्थापनेसंदर्भात उद्याचा दिवस महत्वाचा आहे.दरम्यान, मुख्यमंत्र्यानी राजीनामा दिल्यावर इतर मंत्रिमंडळाने राजीनामे देण्याची गरज नसते.
Visit : bahujannama.com