मुंबई: Devendra Fadnavis On Malpractice In Exams | राज्यात विविध परीक्षेत सातत्याने गैरप्रकार आढळत आहेत. त्यामुळे विरोधकांकडून नेहमीच सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले जात आहे. आमदार रोहित पवार आणि आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी विधानसभेत याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. केंद्रात ज्यापद्धतीने परीक्षेतील गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी कायदा आणलेला आहे. तसाच कायदा राज्यसरकारने करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. (Maharashtra Monsoon Session)
याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, आमच्या सरकारने पारदर्शक नोकर भरती करून एक रेकॉर्ड तयार केले आहे. तसेच यामध्ये एकही पेपर फुटीची घटना घडलेली नाही. जे काही गैरप्रकार होते. ते पेपर फुटीचे नव्हते. तर कॉपी केस, इलेक्ट्रिक डिव्हाइसेसचा वापर अशा तक्रारी आहेत. तरी देखील आम्ही एका विद्यार्थाच्या हॉल तिकीटवर काही आकडे लिहिल्याचा गैर प्रकार आढळून आल्याने जलसंधारण खात्याची परीक्षा रद्द केली आहे.
परीक्षेतील गैरप्रकाराबाबत या अधिवेशनातच कायदा होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पेपरफुटीला लगाम घालण्यासाठी याच अधिवेशनात कठोर कायदा आणणार असून त्याबाबत कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती फडणवीस यांनी विधानसभेत दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील नवीन कायदा आणण्याबाबत सकारात्मक असून याच अधिवेशनात कायदा आणणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.