मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील सत्ता पेच सुटला असला तरी राजकीय नाट्य संपण्याचे काही नाव घेत नाही. त्यात आता एका भाजप नेत्यानेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरुद्ध केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण अजूनच पेटले आहे. ‘केंद्रानं दिलेलं ४० हजार कोटी रुपये वाचवता यावेत, म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचं नाट्य रचलं असल्याचा गौप्यस्फोट भाजपा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना पुन्हा एकदा धारेवर धरले आहे. ही महाराष्ट्राची गद्दारी असल्याचा घणाघात राऊत यांनी केला आहे.
हेगडे काल म्हणाले , ‘आमचा माणूस महाराष्ट्रात ८० तासांसाठी मुख्यमंत्री झाल्याचं तुम्हाला माहीत असेल, मुक्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस यांनी ८० तासांत राजीनामा दिला. त्यांनी हे सगळं नाट्य का घडवून आणलं ? बहुमत नसतानादेखील ते का मुख्यमंत्री झाले ? तर ‘काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचं सरकार आल्यास केंद्राकडून देण्यात आलेल्या निधीचा गैरवापर होईल त्यामुळेच संपूर्ण नाट्य रचण्यात आलं आणि मुख्यमंत्री होताच १५ तासांमध्ये फडणवीसांनी ४० हजार कोटींचा निधी केंद्राकडे परत पाठवला,’ हेगडे यांच्या या गौपास्पोटानंतर राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे.
Bjp mp @AnantkumarH says @Dev_Fadanvis as CM for 80 hours, moved maharashtra's 40000 cr Rs to center ? This is treachery with maharshtra , महाराष्ट्र के साथ गद्दारी है @Officeof UT
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 2, 2019
फडणवीसांना काही दिवसांसाठी मुख्यमंत्री करुन केंद्राकडे निधी परत पाठवायचा ही योजना भाजपानं आधीच तयार करुन ठेवली होती. शपथ घेतल्यानंतर १५ तासांमध्ये फडणवीसांनी केंद्राचे पैसे ज्याठिकाणी पोहोचवायचे होते, त्याठिकाणी पाठवून दिले. ही योजना अंमलात आणण्यासाठीच देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. योजना यशस्वी करुन फडणवीसांनी केंद्र सरकारचा सर्व पैसा वाचवला असल्याचा खुलासा हेगडे यांनी केला आहे.
Visit : bahujannama.com