मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाविकास आघाडी सरकारमुळे OBC चे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. लोकनेते, गोपीनाथ मुंडे (Munde) आज असते तर, OBC चे आरक्षण रद्द करण्याची हिंमत या सरकारची झाली नसती, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच मुंडेंनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नेता बनवले. त्यांच्यासोबत राज्यात आणि विधानसभेत काम करण्याची संधी मिळाली. ते नेहमी सांगायचे की सत्तेसोबत कधी समझोता केलात तर कधीही नेता बनू शकत नाही. सत्तेसोबत संघर्ष केलात तर तुम्ही नेता बनू शकता, असे सांगत फडणवीसांनी मुंडेंच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले.
दिवंगत नेते गोपीनाथ गोपीनाथ मुंडे (Munde) यांच्या 7 व्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावरुन ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते ऑनलाईन माध्यमातून सहभागी झाले होते.
यावेळी फडणवीसांनी मुंडे यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला राज्यातील राजकारणासह गोपीनाथ मुंडे यांनी केंद्रीय राजकारणातही आपली चमक दाखवली.
गोपीनाथ मुंडे यांनी मोठा काळ विरोधी पक्षात घालवला.
युतीची सत्ता आली त्यावेळी ते उपमुख्यमंत्री, गृहमंत्री बनले.
गृहमंत्री म्हणून त्यांनी चांगले काम केलेच.सोबतच ते शेतकऱ्यांचे नेते होते.
विधानसभेत मुंडे यांना ऐकण्यासाठी सर्व सदस्य उत्सुक असायचे.
गोपीनाथ मुंडे यांचे विचार, त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जाण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे फडणवीस म्हणाले.
काही लोक सामान्य म्हणून जन्माला येतात.
पण त्याचे कार्य असामान्य असते गोपीनाथ मुंडे त्यापैकीच एक होते.
एका छोट्या गावातून येऊन त्यांनी महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात एक वेगळा ठसा उमटवला होता, असे फडणवीस म्हणाले.
कृपया हे देखील वाचा:
भाजप खासदार सनी देओल ‘बेपत्ता’; पठाणकोटमध्ये कॉंग्रेसकडून ‘गुमशुदा की तलाश’ अशी पोस्टरबाजी
राज्यात 5 टप्प्यात होणार अनलॉक, मात्र पुण्यात लॉकडाऊन; जाणून घ्या कारण ?
महिलेचे एटीएम कार्ड घेऊन फसवणूक करणार्या स्वप्नील ललवाणीला अटक
मेडिसिन होर्डिंग केसमध्ये गौतम गंभीर फाऊंडेशन दोषी, ड्रग कंट्रोलरने HC ला दिला रिपोर्ट