मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी पक्षावर टीका करत त्यांना चांगलाच टोला लगावला आहे. फडणवीस म्हणाले की, राज्यात नव्याने आलेल्या ठाकरे सरकारला शेतकऱ्यांसाठी लक्ष देण्यासाठी वेळ नाही. मात्र त्यांच्या नेत्यांमध्ये सत्तेसाठी वाद सुरु आहे. तो संपल्यावर त्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल.
When your fights for Govt bungalows, portfolios, offices, guardian ministries are over, will you at least then work for farmers?
बंगले, दालनं, पालकमंत्रीपदं अशी भांडणं संपली की, शेतकर्यांकडे लक्ष देतील का? pic.twitter.com/opEgyH806X— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 14, 2020
महाविकास आघाडीतीच्या नेत्यांमधील नाराजी नाट्यावरूनही फडणवीसांनी टीका केली आहे. राज्यात नवीन सरकार आले असून या सरकारला शेतकरी, शेती, कारखानदारी, सहकार, फळबाग याच्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळाला नाही. सत्तेत असलेल्या तीनही पक्षातील नेत्यांमध्ये सुरु असलेले भांडण संपले तर त्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ मिळेल, असे फडणवीस म्हणाले.
रकारमध्ये असलेले नेते बंगले, दालने, पालकमंत्री पद यांच्यावर वाद घालत आहेत. हे सर्व वाद असून पुढील सहा-आठ महिन्यात जर मिताली तर, त्यानंतर सरकारमध्ये असलेले नेते कदाचित शेतकऱ्यांकडे वळून पाहतील. पण तोपर्यंत तरी शेतकऱ्यांकडे लक्ष देतील असे वाटत नाही, असेही फडणावीस म्हणाले.