मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भाजप (BJP) नेते आणि राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray government) घणाघाती टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रत्येक विभागात भ्रष्टाचार सुरू असून कुणाला कशाचा थांगपत्ता नाही, असे सांगत मंत्री झालेत आपल्या विभागेच राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे, अशा शब्दांत फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. वेगवेगळ्या विभागातले वाझे अजून बाकी आहेत, आणि त्यांचा पत्ता आमच्याकडे आहे. त्यामुळे आपला भ्रष्टाचार बाहेर येईल या भीतीने सरकार 2 दिवसाचे अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केला आहे. devendra fadnavis criticizes cm uddhav thackeray and mva government
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Speaking at the conclusion of @BJP4Maharashtra State Executive Committee Meeting in Mumbai. https://t.co/yF9QPLGzxP
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 24, 2021
भाजपच्या कार्यकारिणी बैठकीला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारचा खरपूस समाचार घेतला. राज्यात अनागोंदी कारभार सुरू असून एक दिवस निर्णय घेतला जातो, मग दुसऱ्या तासाला स्थगिती दिली जाते. मग दुसऱ्या दिवशी निर्णय बदलला जातो. राज्यात कोरोना (Corona) काळात किड्यामुंग्यासारखी माणस मरताना चांगलं काम केल्याचं सांगत स्वत:च पाठ थोपटवून घेतली जात आहे. सध्या राज्यात जे सुरू आहे त्याला सरकार म्हणता येईल का? असा सवाल उपस्थित करत हे सरकार नसून ही सर्कस सुरू आहे, असा हल्लाबोल फडणवीसांनी केला आहे. राज्याच्या इतिहासात भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार, अत्याचारान बरबटलेलं हे सरकार आहे. कोरोना परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्राचं नाव देशात बदनाम झालं. देशातील एकूण मृत्यूंपैकी सर्वाधिक 33 टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले. मृत्यूच्या सापळ्याच महाराष्ट्र मॉडेल या सरकारने तयार केले आहे. देशात कोरोनामुळे मेलेला प्रत्येक तिसरा व्यक्ती महाराष्ट्रातील असून यामुळे शरमेने मान खाली घालण्यासारखी गोष्ट असल्याचे ते म्हणाले.
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसीचे आरक्षण रद्द
ओबीसी आरक्षण (OBC reservation) रद्द होण्यास ठाकरे सरकार पूर्णपणे जबाबदार असल्याचा दावा करत फडणवीस यांनी सरकारमधील मंत्र्यांना डिबेट करण्याचे आव्हान दिले आहे. मी दाव्याने सांगतो. राज्यातील कुठल्याही मंत्र्याने माझ्याशी डिबेट करावा. ओबीसी आरक्षण रद्द होण्यासाठी केवळ राज्य सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदर आहे. राज्य सरकारने 15 महिने झोप काढली. मागासवर्गीय आयोगच नेमला नाही. त्यामुळे कोर्टाने आरक्षण रद्द केल्याचे फडणवीस म्हणाले.
Web Title :- devendra fadnavis criticizes cm uddhav thackeray and mva government
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Gold Rate Today । सोन्याचे दर पुन्हा घसरले, जाणून घ्या आजचे दर
Ajit Pawar । उपमुख्यमंत्री अजित पवारांची सीबीआय चौकशी करा; भाजपाच्या बैठकीत ठराव मंजूर