मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– Devendra Fadnavis | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल संध्याकाळी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. सध्या महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळलं असून भाजपच्या (BJP) गोटात सत्तास्थापनेसाठी हालचालींना चांगलाच वेग आला आहे. दरम्यान, भाजप आमदारांना मार्गदर्शन करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) आभार मानत मोठं वक्तव्य केलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
“भाजपच्या नेतृत्वाखाली पुढील अडीच वर्षांत सत्तेवर येणारे सरकार 25 वर्षे चालेल,” असं विधान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे. “हे अडीच वर्षाचं सरकार पुढचे २५ वर्ष चालेल. एकनाथ शिंदे गटाचे 40 आमदार यांचे विशेष आभार. अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची एकनाथ शिंदे यांच्या गटानं हिंमत केली. या एकनाथ शिंदे गटाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. येत्या अडीच वर्षात महाराष्ट्रातील प्रश्नांना न्याय द्यायचा आहे, तसेच, पुढील सूचना येईपर्यंत भाजपच्या सर्व आमदारांनी मुंबईतच थांबावे,” असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि इतर भाजप नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.
सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) आदेशानंतर राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन त्यावर चर्चा करण्यात आली.
एकनाथ शिंदे यांचा गट मूळ शिवसेना आहे, यावरही चर्चा झाली. भविष्यात आपण काय भूमिका घ्यायच्या यावरही चर्चा झाली.
त्यानुसार सरकार स्थापन करण्याचा निर्णय ठरल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.
तसेच, आजही भाजपच्या कोअर कमिटीची बैठक असून यात सत्ता स्थापनेवर चर्चा केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update