नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – Devendra Fadnavis | शिवसेनेचा शुक्रवारी दसरा मेळावा झाला. यावेळी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी शिवसैनिकच मुख्यमंत्री बनेल याचा पुनरूच्चार केला. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूर येथील आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. नारायण राणे (Narayan Rane), राज ठाकरे (Raj Thackeray) यांना बाहेर का पडावं लागलं? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दोन वर्षे झाली तरी सारखं तेच मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. आता मुखवटा काढा तुमची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्री बनण्याची होती हे मान्य करा. महत्त्वकांक्षा असणे राजकारणात चुकीचे नाही. पण त्यामागे खोटं सांगणं हे चुकीचं आहे. जर तुम्हाला खरंच मुख्यमंत्री बनायचं नव्हतं तर तुमच्याकडे रावते, देसाईंसारखे शिवसैनिक होतेच. त्यांना मुख्यमंत्री करायचे. का केले नाही तसे असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री जर आपणाला बनायचं नव्हतं तर पक्षाच्या बाहेर राणेंना का जावं लागल? राज ठाकरेंना बाहेर का जावं लागलं. त्यांना पक्षावर कब्जा करायचा नव्हता. या सर्व गोष्टी बोलणं बंद केलं पाहिजे, असंही फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.
सरकार पडेल हे कळणारही नाही
हे रोज म्हणतात सरकार पाडून दाखवा, पण ज्या दिवशी हे सरकार पडेल ते कळणार पण नाही. सध्या त्यात आम्हाला रस नाही. कामं करून दाखवा, शेतकऱ्यांची मदत करा, तुमच्या हाती सत्ता आहे तुम्ही मदत करून दाखवा.
काल मुख्यमंत्री जे बोलले त्यावरून फ्रस्ट्रेशन दिसून येतं. जनतेनं भाजपला नाही तर काँग्रेस शिवसेनेला नाकारलं आहे. एवढाच नाही तर शिवसेनेला पासिंग मार्क्स दिले. जनतेशी बेईमानी करत हे सरकार स्थापन केलं गेलं आहे असेही त्यांनी या वेळी सांगितले
.
Web Title : Devendra Fadnavis | bjp leader devendra fadnavis slams cm uddhav thackeray over narayan rane and raj thackeray.