मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | महापरिनिर्वाण दिवस (Mahaparinirvana Day) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो 6 डिसेंबर रोजी आयोजित केला जातो. या पार्श्वभुमीवर सर्वत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जात आहे. दरम्यान, महापरिनिर्वाण दिनानिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘देशासमोरील सर्व प्रश्नांचं उत्तर संविधानामध्ये मिळतात,’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान समितीत दिलेलं जे भाषण आहे ते आजही द्यावं अशी आज परिस्थिती आहे. संकुचित वृत्ती सोडून आपण एका मार्गानं चालण्याचा विचार केला तर आपण हा देश महान बनवू शकतो. आज देश त्या मार्गानं चाललेला आहे. मात्र, काही व्यक्ती संकुचित त्या मार्गावरुन देशाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
‘बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर चालून येत्या 10 वर्षात जगातील विकसित देश म्हणून विकसित करु शकतो. देशासमोरील सर्व प्रश्नांचं उत्तर संविधानात आहे. संविधानात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यामुळं देश एक आहे. संधीची समानता या मुळं कोणी मागं रहाणार नाही, तसेच, संविधानाच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तीला न्याय देता येईल,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Web Title :- Devendra Fadnavis | bjp leader devendra fadnavis said all answer of question before nation found in constitution of india.