नागपूर : बहुजननामा ऑनलाईन –
काँग्रेस नेते आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी देवेंद्र फडणवीस यांना चांगलाच सल्ला दिला आहे. सत्ता गमावलेल्या देवेंद्र फडणवीस यांना आत्मचिंतन करण्याची गरज असून त्यांनी रामदेव बाबांकडे जावे, असा सल्ला त्यांनी फडणवीसांना दिला आहे. नागपूर जिल्हा पारेषदेच्या निवडणुकीबद्दल पत्रकारांशी बोलताना सुनील केदारी यांनी निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीच विजयी होईल, असा विश्वासही व्यक्त केला.
नागपूर जिल्हा परिषदेसाठी भाजपने चांगलीच तयारी केली असून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत ताकद पणाला लावली आहे. राज्यात सत्ता स्थापन झाल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीला निवडणूक जिंकण्याचा विश्वास आहे. फडणवीस यांनी पाच वर्ष सत्ता कोणासाठी वापरली, पक्ष संघटना किती बळकट केली, हे आता कळेलच. आपल्याला जनतेने पराभूत का केले, याचा विचार त्यांनी करावा. त्यासाठी त्यांनी रामदेव बाबांकडे जावे, असे टोले केदारी यांनी त्यावेळी लगावले. तसेच भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल त्यांना प्रश्न केलं असता बावनकुळेंना त्यांच्याच पक्षाने चिंतन करायला सांगितले आहे. त्यांच्याबद्दल मी काय बोलणार, असे केदारी म्हटले.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी नागपूर जि. परिषदेत शिवसेना स्वतंत्र लढणार आहे. निवडणूक निकालानंतर नागपूरमध्ये महाविकास आघडी दिसणार का, या पत्रकारांच्या प्रश्नाला त्याची गरज भासणार नाही, असे केदारी म्हणाले. जि. परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादीला बहुमत मिळेल. त्यामुळे इतर गीष्टींची चर्चा नको, असेही केदारी म्हणाले.