लासलगाव : बहुजननामा ऑनलाईन – लासलगाव ते नाशिक, देवळाली,इगतपुरी, मुंबई येथे रोज, गोदावरी एक्सप्रेस या प्रवासी गाडीने हजारो प्रवाशी ये-जा करीत असता. २३ मार्च २०२० पासुन लॉकडाऊन सुरू झाले व सर्व रेल्वे बंद झाल्या, त्यामुळे सर्व चाकरमानी हे घरीच बसुन आहे. आता नाशिक व मुंबई येथे सर्व कार्यालये , कोर्ट, शिक्षण संस्था, दुकाने व इतर कार्यालयेे सुरू झाले आहे. कामावर येण्या-जाण्यासाठी रेल्वे हा एकमेव पर्याय आहे. दुसर्या साधनांनी जाण्यासाठी आर्थिक,शारीरीक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.
गोदावरी एक्सप्रेस ही कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत धावणारी गाडी असून ती सुरू झाल्याने सर्वाधिक प्रवाशांना फायदा होईल. तसेच गोदावरी एक्सप्रेस महिला, मुली व इतर सर्वच प्रवाशांना वेळेत घरी येणे देखील शक्य होते त्यामुळे ही गाडी तातडीने सुरू करणे गरजेचे असल्याचे प्रकाश पाटील यानी निवेदनात म्हटले आहे
बहुतेक चाकर मानी हे हातवर असुन त्यांचा परिवाराच उदरनिर्वाह त्यांच्याच पगारावर होत असतो. पण रोज ये-जा करण्यासाठी साधन नसल्यामुळे बहुतेकांच्या नोकर्या गेल्या आहे त्यामुळे त्यांना उदरनिर्वाहाचे साधन नसल्यामुळे ते हालाखीचे जीवन जगत आहे.
सर्व सामान्य नागरीकांसाठी संजिवनी ठरलेल्या ईगतपुरी-मनमाड शटल,देवळाली-भुसावळ पॅसेंजर, भुसावळ-मुंबई पॅसेंजर सुध्दा प्रवाश्यांसाठी सुरू करणे आवश्यक आहे. सामान्य जनतेला कमी भाड्यात पोहचविणार्या रेल्वे गाड्या तात्काळ सुरू करून नागरिकांना न्याय द्यावा.
सदर प्रश्न संसदिय हिवाळी अधिवेशनात मांडुंन रेल्वे तत्काळ सुरु करण्यात येऊन नाशिक जिलह्यातील प्रवाशांना न्याय द्यावा अशी विनंती शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांनी केली असता खासदार हेमंत गोडसे हे उद्याच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी समक्ष भेटून तात्काळ प्रश्न मार्गी लावनार असल्याचे सांगितले त्या प्रसंगी युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण पाळदे ,लामको संचालक प्रवीण कदम ,रेल्वे प्रवासी संघटना लासलगाव चे अध्यक्ष राजेंद्र जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशुतोष सूर्यवंशी, युवा सेनेचे मंदार खानापूरकर ,गणेश कुलकर्णी , योगेश नाबरा ,समर्थ पाटील आदी उपस्थित होते.