नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागच्या काही दिवसात दिल्लीत झालेल्या हिंसेत २२ लोकांचा मृत्यू झाला असून अनेकांचे त्यात नुकसान झाले आहे. या २२ लोकांचा मृत्यू दगडफेकीमुळे झाला असून दिल्ली पोलिसांनी हिंसेत मारल्या गेलेल्या ३५ लोकांच्या मृत्यूचे कारण जाणून घेतले आहे. या ३५ लोकांपैकी २२ जणांचा मृत्यू दगडफेकीमुळे झाला असून १३ जणांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला आहे.
पोलिसांनी शुक्रवारी उत्तर-पूर्व दिल्लीत झालेल्या हिंसेत ३५ लोकांच्या मृत्यूचे कारणही स्पष्ट केले आहे. ३५ मधील २२ लोकांचा मृत्यू त्यांच्यावर दगडफेक झाल्याने किंवा त्यांच्यावर झालेल्या शारीरिक हल्ल्यामुळे झाला आहे. आणि १३ लोकांचा मृत्यू बंदुकीच्या गोळीमुळे झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत हाती आलेल्या रिपोर्टनुसार हिंसेदरम्यान ३५ लोकांचा मृत्यू जखमी झाल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे झाला आहे. गोळी लागल्यामुळे १३ लोकं मृत्युमुखी पडली असून २२ लोकं गंभीर स्वरूपाने जखमी झाल्यामुळे मृत्युमुखी पडली आहेत. दिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, या हिंसेदरम्यान मारल्या गेलेल्या लोकांमध्ये जास्तकरून २० ते ३० वयोगटातील लोकं होती. पण हॉस्पिटलमधील अधिकारी मृतांची संख्या ४१ सांगत आहेत.
शारीरिक हल्ल्यात किंवा दगडफेकीमुळे मारल्या गेलेल्या लोकांची नावे
1. आलोक तिवारी (वय 32 – शारीरिक हल्ला)
2. मोहसिन (वय 25 – शरीरिक हल्ला)
3. सलमान (वय 24 – दगडफेकीत मृत्यू)
4. आयबी कर्मचारी अंकित शर्मा (वय 26 – शारीरिक हल्ला)
5. असफाक हुसैन (शारीरिक हल्ला)
6. दिलबर सिंह नेगी (वय 21 – शारीरिक हल्ला)
7. महरुफ अली (वय 32 – शारीरिक हल्ला)
8. मेहताब (वय 22 – शारीरिक हल्ला)
9. जाकिर ( वय 24 – शारीरिक हल्ला)
10. दीपक कुमार (वय 34 – चाकू हल्ला)
गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे
1. अमन (वय 18)
2. दिनेश (वय 35)
3. हेड कॉन्स्टेबल रतन लाल (वय 42)
4. इस्तयाक (वय 24)
5. मोहम्मद मुबारक हुसैन (वय 28)
6. मोहम्मद मुदस्सर (वय 30)
7. प्रवेश (वय 48)
8. राहुल सोलंकी (वय 26)
9. वीर भान (वय 50)
10. मोहम्मद फुरकान (वय 30)
11. शाद मोहम्मद (वय 35)
पण दिल्ली पोलिसांना राहुल ठाकूर, फैजान, नितीन आणि विनोद यांच्या मृत्यूमागचे कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार नॉर्थ-ईस्ट दिल्लीतील या हिंसाचारात आतापर्यंत १२३ एफआयआर नोंदवण्यात आल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १०० लोकांना अटक केली असून ५३० लोकांना ताब्यात घेतले आहे.