नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीमुळे सध्या येथील राजकीय वातावरण तापले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला टक्कर देणे सोपे नसल्याचे लक्षात आल्याने भाजपाने येथे आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. आम आदमीला शह देण्यासाठी भाजपाने निवडणुकीच्या रणांगणात मोठी फौज उतरवली आहे. तब्बल 200 खासदार, 70 केंद्रीय मंत्री आणि 11 मुख्यमंत्र्यांना यासाठी बोलावण्यात आले आहे. दरम्यान, ही 250 जणांनी टीम हरविण्यासाठी येत असल्याची टीका आम आदमी पार्टीने केली आहे.
दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील 70 विधानसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. मात्र, शाहीन बागमध्ये सुरू असलेले आंदोलन, सीएए, एनआरसीविरूद्ध सुरू असलेली आंदोलने आणि केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने दिल्लीत केलेली समाजपयोगी आणि विकासाची कामे पाहता भाजपाला ही निवडणूक जिंकणे सोपे नसल्याचे दिसत आहे. खरी लढत आप आणि भाजपामध्ये असल्याचे म्हटले जात असले तरी भाजपाने खुपच धास्ती घेतल्याचे दिसत आहे. देशभरातील नेत्यांची मोठी फौज येथे भाजपा तैनात करत आहे.
"भाजपा के 200 सांसद, 70 केंद्रीय मंत्री और 11 मुख्यमंत्री दिल्ली आ रहे हैं।
भाजपा के करीब 250 बड़े नेता दिल्लीवालों को हराने के लिए आ रहे है, दिल्ली के बेटे केजरीवाल को हराने के लिए आ रहे है" : @ArvindKejriwal #KejriwalvsEntireBJP pic.twitter.com/kvwuAdtjhe
— AAP (@AamAadmiParty) January 28, 2020
सत्ताधारी आप, भाजपा आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसून रणांगणात उतरले आहेत. यापैकी भाजपाची ताकद जास्त असली तरी आम आदमी पार्टीने भाजपासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. भाजपासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. यासाठीच भाजपाने तब्बल 200, खासदार, 70 केंद्रीय मंत्री आणि 11 मुख्यमंत्री दिल्लीमध्ये प्रचारासाठी येत आहेत. हे सर्व जण आपला हरवण्यासाठी मुक्काम ठोकणार असल्याचा जोरदार प्रचार आपने सुरू केला आहे. सोशल मीडियासह सर्वत्र आप भाजपावर निशाणा साधत आहे.
महरौली और छतरपुर की जनता 'आप' के साथ चल रही है। आज दोनों क्षेत्रों के रोड शो में लोगों का बहुत प्यार और समर्थन मिला। pic.twitter.com/GP2CYD6tLX
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 28, 2020
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे की, आप सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांना भाजपा घाबरला आहे. पंतप्रधान मोदी यांचा अपवाद वगळता सर्वांनाच प्रचारात सक्रिय करण्यात आले आहे. मात्र दिल्लीकर मतदार हे सूज्ञ असून ते आपला मत देतील. दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, मी गेल्या काही दिवसांपासून पाहत आहे की, अमित शहा आपल्या प्रचार सभेमध्ये दिल्लीकरांचा अपमान करत आहेत. दिल्लीकरांनी आपल्या मेहनतीने शाळा, रुग्णालये सुधारली आहेत. मात्र अमित शहा हे दिल्लीतील शाळांचा आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा अपमान करत आहे. त्यामुळे बरेच पालक दुखावले आहेत, असा दावा केजरीवाल यांनी केला आहे.
Visit : bahujannama.com