नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत उत्तर-पूर्ण क्षेत्रात पसरलेल्या हिंसेबाबत याचिकेवर आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार आहे. कोर्टाने नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात दिल्लीतील शाहीन बागसह इतर ८ जागांवर केल्या जाणाऱ्या निषेधावर दिल्ली पोलीस, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने नोटीस जारी केली आहे. हायकोर्टात याचिका दाखल करत याचिका करणाऱ्यांनी अपील केले होते की, निषेधाला फंडिंग कोण करत आहे, या प्रकरणावर तपास केला पाहिजे.
दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश डी.एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या खंडपीठ या प्रकरणावर सुनावणी करत आहे. सुनावणी दरम्यान याचिकाकर्ते अजय गौतम यांनी म्हटले की, निषेधामुळे दिल्लीच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर हायकोर्टाने दिल्ली पोलीस, दिल्ली सरकार, केंद्र सरकारला नोटीस दिली असून ३० एप्रिल पर्यंत उत्तर द्यायला सांगितले आहे.
द्वेषयुक्त भाषण प्रकरणात नेत्यांनी हायकोर्टाच्या नोटीस दरम्यान दिल्ली हायकोर्टाने काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि वारीस पठाण यांच्याद्वारे केल्या गेलेल्या विधानावर सुनावणी केली आहे. याचिकाकर्त्यांनी या नेत्यांवर दिल्ली निवडणुकीदरम्यान भडकाऊ भाषण दिल्याचा आरोप केला आहे. नेत्यांनी भडकाऊ भाषण दिले आणि लोकांना भडकवले, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. याप्रकरणाची पुढची सुनावणी १३ एप्रिलला होणार आहे. याचिकेत सोनिया गांधी यांच्या मोदी सरकारच्या विरुद्ध रस्त्यावर उतरले पाहिजे, या विधानाचाही हवाला दिला गेला आहे.
Delhi High Court issues notice to Centre, Delhi government on a plea seeking direction to 'investigate and identify anti-national forces and the funding behind the anti-CAA protests Delhi'.
— ANI (@ANI) February 28, 2020
हायकोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर, हर्ष मंदिर यांच्याविरोधात एनआयए चौकशीची मागणी करण्यात आली. या दोघांवरही नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी प्रकरणांवर भडकाऊ ट्विट केल्याचा आरोप आहे.