नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज दिल्लीत विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान सुरू असून अजून मतदानाच्या दिवशीही नेते त्यांच्या वक्तव्य करणे काही थांबत नाही. दिल्लीत भाजपाची निवडणूक प्रचार सीएएविरोधात सुरू असलेल्या शाहीनबाग निषेधाच्या अजेंडावर होत असून मतदानाच्या दिवशीही हा मुद्दा व्यापलेला आहे. तसेच भगवान हनुमानाबद्दल भाजपा आणि आप नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध अजून सुरूच असून भाजपचे सर्व नेते भगवे रंगात दिसत आहेत. पश्चिम दिल्लीतील भाजपचे खासदार परवेश वर्मा आणि त्यांच्या पत्नीसह मत देण्यासाठी आले असताना ते म्हणाले की, दिल्लीतील जनतेने ते शाहिनबाग सोबत आहे का नाही ठरवायचे आहे. मॉडेल टाउन सीटचे भाजपचे उमेदवार कपिल मिश्रा यांनी दिल्लीतील लोक मतदान करून हिशोब लावतील, असे म्हटले आहे. त्याचबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी म्हणाले की, दिल्लीत भाजपाला तितकीच जागा मिळत आहे जितक्या दिवसांपासून शाहिनबागेत आंदोलन सुरु आहे.
आरएसएसचे सहसंपर्क प्रमुख रामलाल यांनी मतदान केल्यानंतर असे सांगितले की मतदानाच्या दिवशी केवळ शाहीन बागच नव्हे तर अनेक मुद्द्यांवर मतदान केले जात आहे. त्यांनी शाहीन बागेत निषेध करणाऱ्या लोकांवर टीका करत “जे लोक कागद न दाखवण्याबद्दल बोलत होते त्यांना आज मतदान करण्यासाठी कागद दाखवावाच लागेल. आज मतदानाच्या दिवशी कागद न दाखवणारी मानसिकता हरेल आणि कागद दाखविणारी मानसिकता जिंकेल.” कपिल मिश्रा म्हणाले की, दिल्लीकरांनो आज हे सांगण्याचा दिवस आहे की जर ‘ते’ एक होऊन मतदान करू शकतात तर ‘आम्ही’ही एक होऊन मतदान करू शकतो. “आज सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा द्याच. ‘घराघरात भगवा पसरला तर रामराज्य येईल. राज्याभिषेकाची तयारी करा, भगवा येत आहे. जय श्री राम,” असेही ते म्हणाले.
दिल्ली निवडणूक प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांनी स्वतःला हनुमान भक्त असल्याचे सांगत हनुमान चालीसाचे पठण केले आणि कॅनॉट प्लेसमधील हनुमान मंदिराला भेट दिली. भाजपवर टीका करताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद म्हणाले, “जेव्हापासून मी टीव्ही चॅनेलवर हनुमान चालीसा वाचली आहे तेव्हापासून भाजपचे लोक माझी खिल्ली उडवत आहेत. काल मी हनुमान मंदिरात गेलो. आज भाजप नेते म्हणत आहेत की, माझ्या जाण्याने मंदिर अशुद्ध झाले. हे कोणत्या प्रकारचे राजकारण आहे ?” पुढे ते म्हणाले की, देव प्रत्येकाचा आहे. देव प्रत्येकाला आशीर्वाद देईल, भाजपला सुद्धा. सगळ्यांचे भले होईल. याआधी दिल्लीचे भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी म्हणाले होते की, ‘पहा हनुमान भक्त केजरीवाल यांचे सत्य. ज्या हातांनी बूट काढले त्याच हातांनी बाबांवर फुलं फेकली.’