नवी दिल्ली: वृत्तसंस्था – देशाच्या राजधानी दिल्लीत कोरोना विषाणूच्या वाढत्या आपत्ती दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. आता दिल्लीतील प्रत्येक व्यक्तीने मास्क घालणे आवश्यक आहे. बुधवारी एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने हा आदेश दिला आहे.
न्यायमूर्ती प्रतिभा सिंह यांनी आदेश दिला की, दिल्लीत प्रत्येक व्यक्तींनी मास्क घालणे अनिवार्य आहे. आदेशानुसार, एखादी व्यक्ती एकट्याने वाहन चालवीत असेल तरी त्याने मास्क घातला पाहिजे.
कोर्टाचे असे म्हणणे आहे की जर वाहनामध्ये एकच व्यक्ती बसला आहे, जर ते सार्वजनिक ठिकाण असेल तर, मास्क घालणे आवश्यक आहे.
जर एखादी व्यक्ती दिल्लीमध्ये एकट्याने वाहन चालवीत असेल आणि त्याने मास्क घातला नसेल तर २००० रुपये दंड भरावा लागेल. न्यायालयात दंडाबाबत आव्हान दिले गेले होते, परंतू कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.
दिल्ली सरकारमध्ये कोर्टाने सांगितले की कोरोनामुळे कारमध्ये मास्क घालणे आवश्यक आहे. रस्त्यावर असलेले कोणतेही वाहन ते खाजगी वाहन आहे असे सांगून स्वतःचा बचाव करू शकत नाहीत.
दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचे संकट वाढत आहे. आदल्या दिवशी दिल्लीत एकूण ५१०० कोरोना केसेस नोंदवले गेले, जी गेल्या ६ महिन्यातील सर्वात मोठी संख्या आहे. हेच कारण आहे की दिल्लीमध्ये सक्ती वाढविली गेली आहे.
दिल्लीमध्ये लागू झाला ‘नाईट कर्फ्यू’
दिल्ली सरकारने आता संपूर्ण एप्रिल महिन्यात नाईट कर्फ्यू लागू केला आहे. दिल्लीत सकाळी दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत काटेकोरपणे कर्फ्यू असेल. लोकांना परवानगीशिवाय बाहेर जाण्यास मनाई आहे. जर कोणी ड्युटीवर जात असेल, दुकान उघडत असेल तर परवानगी घ्यावी लागेल.
यापूर्वी मास्क घालण्यासाठी दिल्लीत सक्ती केली होती. मास्क घातलेले नाहीत, त्यांच्याकडून दंड घेतला जात होता. गाडीमध्ये मास्क घातला आहे की नाही हे तपासले जात होते. तथापि, लॉकडाऊन हटवल्यानंतर लोक मास्ककडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत.