बहुजननामा ऑनलाइन टीम – दिल्लीत २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी हिंसक वळण लागलं. त्यावेळी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चा वेळी त्या परिसरात(Death of Sitabai Tadvi) हिंसाचार झाला. त्या दिवशी पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आले. तसेच या दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ते म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील आंबाबारी येथील रहिवासी सिताबाई तडवी (वय ५६) या १६ जानेवारीपासून दिल्लीतील शेतकरी आंदोलनासाठी दिल्लीला गेल्या होत्या. त्या २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी शेतकरी आंदोलनाच्या परेडमध्येही सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर त्या रात्रीच्या दरम्यान दिल्लीहून नंदुरबारकडे येत होत्या. जयपूर स्टेशनला ट्रेनची वाट बघत असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि सकाळी ५ च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
सिताबाई तडवी यांनी यापूर्वी देखील विविध आंदोलनात सहभाग घेतला होता. लोकसंघर्ष मोर्चाचा उलगुलांन आंदोलन, वनजमिनीचे आंदोलनमध्ये त्यांनी आदिवासींचा न्याय हक्कासाठी संघर्ष केला. त्यांच्या मृत्यूची माहिती समजताच कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मोठ्या प्रमाणात थंडी असल्याने सिताबाई तडवी यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
गेले साठ दिवसापासून दिल्लीच्या वेशीवर केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला प्रजासत्ताकदिनी हिंसक वळण लागलं. त्यावेळी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्चवेळी त्या परिसरात हिंसाचार झाला. या प्रकरणावरून २२ गुन्हे (FIR) नोंदवण्यात आल्या असून २०० जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच शेतकरी नेत्यांविरोधातही FIR नोंदवण्यात आले आहेत. तर दिल्ली पोलीस आता सीसीटीव्ही फुटेडच्या माध्यमाने निदर्शनकर्त्यांचा शोध घेत आहे. यासाठी, लाल किल्ला, नांगलोई, मुकरबा चौक आणि सेंट्रल दिल्लीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज काढण्यासाठी स्पेशल सेल आणि क्राइम ब्रांचची मदत घेतली जात आहे. यात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर, लाल किल्ल्यावर चढणाऱ्यांवर आणि सरकारी संपत्तीचे नुकसान करणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असेल. याच बरोबर, ज्यां नेत्यांनी शेतकऱ्यांना भडकावले अशा नेत्यांवरही पोलिसांची नजर असणार आहे.