नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुप्रीम कोर्ट आगामी दोन आठवड्यात राम मंदिरावरील निर्णय केव्हाही देण्याची शक्यता आहे. सर्वच पक्षकार अंतिम निर्णयाची आतुरतेने वाट पहात आहेत. अशात एक व्यक्ती असा आहे जो राम मंदिराच्या निर्मितीसाठी उलटी गिनती करत आहे. रचना पाडण्यापूर्वी 3 वर्ष आधी 9 नोव्हेंबर 1989 मध्ये राम मंदिराच्या निर्मितीसाठी पहिली वीट ठेवणारे दलित परिवारातील कामेश्वर चौपाल यांचं म्हणणं आहे की, “माझ्यासाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे. एवढी वर्षे उलटूनही राम मंदिराच्या निर्मितीशिवाय दुसरा कोणताच विचार माझ्या मनात नाही.” 63 वर्षीय कामेश्वर चौपाल यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्या भावना मांडल्या आहेत.
‘पूर्ण समाजाच्या सहकार्यानं व्हावी राम मंदिराची निर्मिती’
कामेश्वर चौपाल म्हणाले, “राम मंदिर पूर्ण सामाजाच्या सहकार्याने व्हायला हवं. पूर्ण समाज म्हणजे सर्व संप्रदाय आणि धर्म असा माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे. यात हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई या सर्वांचा समावेश आहे. सर्वांनी सोबत पुढे येऊन राम मंदिराच्या निर्मितीसाठी सहकार्य करायला हवं. यातून असा संदेश जाईल की, भारतात सर्व संप्रदायांना समानतेची वागणून दिली जाते. इथे सर्व धर्मांना बरोबरीचा सन्मान दिला जातो. भारताला प्राचीन काळातील विश्व गुरू यासाठी मानलं गेलं आहे कारण आम्ही एकता आणि अखंडतेचं उदाहरण जगासमोर ठेवलं. राम मंदिराच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत खूप कालावधी पार पडला. दरम्यान, मी रामाच्या संवेदना समाजात नेण्याचा प्रयत्न केला.”
‘काँग्रेस सरकारनेही केलं राम मंदिराच्या निर्मितीसाठी काम’
चौपाल म्हणतात की, “राम खरा आहे. राम देशाचा आत्मा आहे. राम मंदिराच्या निर्मितीसाठी सर्वजण सोबत येतील अशी मला आशा आहे. आम्ही हे ध्येय गाठण्यासाठी इतर मार्गही अवलंबू शकत होतो परंतु आम्हाला न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. आम्हाला भारताच्या लोकशाहीवर आणि संविधानावर पूर्ण विश्वास आहे. केवळ भाजप सरकारनेच नाही तर काँग्रेससहित सर्वच सरकारने या दिशेने काम करण्याचा प्रयत्न केला आहे.”
सत्तेच्या लोभात कॉंग्रेसने रामचे अस्तित्व नाकारले
चौपाल म्हणाले, “देशात राम आणि भाकरी दोन्हीही हवं आहे. राम असेल तरच भाकर असेल. केवळ रामच आम्हाला भाकरी देऊ शकतात. वर्षानुवर्षे देश गुलाम होता. कोणीच आमच्यासाठी काम करत नव्हतं. मग एक दिवस बंकिमचंद्र चटर्जी यांनी स्वातंत्र्यासाठी वंदे मातरम लिहिलं. तोपर्यंत आम्ही भारत माता पाहिली नव्हती पण एका गाण्याने लोकांच्या भावना जागृत केल्या. तरुण उत्साहित झाला आणि आम्ही ब्रिटीशांविरुद्ध लढा सुरू केला. रामाचा देखील तोच प्रभाव आहे आणि तो आपल्याला सामर्थ्य देतात. राम नसेल तर लोक भाकरीसाठी महाग होतील. काँग्रेसने रामाला मिथ म्हटलं. महात्मा गांधींनी आम्हाला रघुपती राघव राजा राम दिले आणि कॉंग्रेसला सत्तेपर्यंत पोहोचवलं. त्याच कॉंग्रेसने सत्तेच्या लोभात रामाचे अस्तित्व नाकारले आणि मतांसाठी राजकारण केले.
Visit – www.bahujannama.com