मलप्पुरम (केरळ): वृत्तसंस्था – देशभरात सध्या CAA आणि NRC कायद्यावरून वादंग उठल्याचे पहायला मिळत आहे. देशभरात काही ठिकाणी CAA आणि NRC विरोध होत आहेत तर काही ठिकाणी या कायद्याच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरले आहेत. पण केरळ मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारतीय जनता पक्षाने नागरिकता सुधारणा कायद्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला तीन लोकांनी हजेरी लावल्याचा राग धरून वलन्चेरी येथील एका दलित वसाहतीचे पिण्याचे पाणी बंद केला गेला. एका भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने आपल्या ट्विटर हँडलवरन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. यानंतर महसूल विभागाने हा पाणी पुरवठा सुरू व्हावा यासाठी तातडीने सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेतला.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , या वसाहतील बहुतेक नागरिक हे भारतीय जनता पक्षाचे समर्थक आहेत. गेल्या वर्षभरापासून ग्राम पंचायतीची पाणी पुरवठा योजना बंद असल्याची माहिती एका ग्रामस्थाने दिली. या मुळे आम्हाला एक किमीच्या अंतरावरून पायपीट करत पाणी आणावे लागते अशीही माहिती त्या रहिवाश्याने दिली.
त्यानंतर काही दिवसांपूर्वी एका मुस्लीम कुटुंबाने आपल्याकजील पाणी या दलित वस्तीला देण्याची सोय केली. हे कुटुंब या वस्तीतील प्रत्येक कुटुंबाला तीन बादल्या पाणी देत असे. शुक्रवारी, दलित वस्तीतील तीन लोक भारतीय जनता पक्षाच्या सीएएला पाठिंबा देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजर राहिले. त्यानंतर त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे पाहिल्यानंतर इतर मुस्लीम समाजाच्या लोकांनी भाजप समर्थकांना पाणी पुरवठा करणाऱ्या त्या मुस्लीम कुटुंबावर आक्षेप घेतला. त्यानंतर या कुटुंबाने पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला, असे अखिला हिने सांगितले.
दलित वस्तीच्या बाजूला राहणाऱ्या एका मुस्लीम कुटुंबाने हे पिण्याचे पाणी बंद केले, असा आरोप चेरुकुन्नू दलित वस्तीतील रहिवाशांनी सांगितले. हे मुस्लीम कुटुंब दलित वस्तीला पाणी देत असे. १७ जानेवारीपासून हा पाणीपुरवठा बंद करण्याचे आल्याचे रहिवाश्यांनी सांगितले. या भागात भारतीय जनता पक्षाने नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत जनजागृती मेळाव्याचे आयोजन केले होते. हा कार्यक्रमात वलन्चेरी या शहरात आयोजित करण्यात आला होता.