पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोव्हिशिल्डच्या (Covishield) दोन्ही डोसनंतरही शरीरातील कोरोनाविरुद्धची प्रतिपींडे (ॲन्टीबॉडी) कमी होत असल्याचे ‘लान्सेट’च्या शोधनिबंधातून स्पष्ट होते. त्यामुळे नागरिकांनी तिसरा डोस घ्यावा का ? असा प्रश्न सिरम इन्स्टिट्यूटचे (Serum Institute) संस्थापक डॉ. सायरस पूनावाला (Cyrus Poonawalla) यांना विचारण्यात आला. यावर बोलताना सायरस पुनावाला (Cyrus Poonawalla) म्हणाले, मी स्वत: कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या डोसनंतर सहा महिन्यांनी तिसरा डोस घेतला आहे. तसेच सिरमच्या कर्मचाऱ्यांनाही तिसरा डोस दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कारात ते बोलत होते. सायरस पुनावाला (Cyrus Poonawalla) यांना टिळक पुरस्कार (Tilak Award) देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde), टिळक स्मारक मंदिराचे (tilak smarak mandir) अध्यक्ष डॉ. दीपक टिळक 9Dr. Deepak Tilak), डॉ. रोहित टिळक (Dr. Rohit Tilak), डॉ. गितांजली टिळक (Dr. Gitanjali Tilak) आदी उपस्थित होते. पुरस्कार समारंभानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी लोकांनीही कोव्हिशिल्डचा दूसरा डोस झाल्यानंतर सहा महिन्यांनी तिसरा बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहन पुनावाला यांनी केले.
पुनावाला यांच्याकडून मोदींचे कौतुक
सीरमचा आजवरचा प्रवास खूप खडतर आणि वेदनादायी राहिला आहे. पूर्वी परवानग्या मिळण्यासाठी जाच सहन करावा लागत होता. अन्न व औषध प्रशासनाकडून पूर्वी मोठ्या प्रमाणावर लालफितीचा कारभार केला जात होता. परंतु मोदींच्या काळात नोकरशाहीची चहा-कॉफीची पद्धत बंद झाल्याने त्रास ही कमी झाला. त्यामुळे आता तात्काळ एफडीएकडून (FDA) परवानगी मिळते. म्हणूनच आम्ही कोविशिलड वेळेवर बाजारात आणू शकलो, असे पूनावाला म्हणाले.
मोदी सरकारवर टीका
कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर आम्ही लसीकरणाचे वर्षाला 110 कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. महिन्याला 10 कोटी लसींचे उत्पादन (Vaccine production) हि सोपी गोष्ट नाही. भारत सरकार (Government of India) वर्षाअखेरीस लसीकरण पूर्ण होण्याचे आश्वासन देत आहे. त्यांनी अशा थापा मारणे बंद करावे, अशी टीका सायरस पूनावाला यांनी मोदी सरकारवर केली आहे.
परदेशात लस पाठवण्यास बंदी घालून वाईट केले
मोदी सरकारने (Modi government) लस परदेशात पाठवण्यास बंदी घालून अतिषय वाईट गोष्ट केली आहे. माझा मुलगा मला म्हणाला की यावर बोलू नका, पण मी बोलणार आहे. कारण सिरम इन्स्टीट्यूट अनेक वर्षांपासून जगभरातील 170 देशांना लसींचा पुरवठा करत आहेत. मात्र, आता गरज असताना त्यांना लस देता येत नाही. या देशांसाठी लसीसाठी अधिक पैसे दिलेत. बिल गेट्स फाउंडेशनने (Bill Gates Foundation) 5 हजार कोटी दिले आहे. लसींची निर्यात सुरु केली पाहिजे. अनेक देशांनी आगाऊ पैसे दिले आहेत. त्याना लस पाठवायची आहे, असेही सायरस पुनावाला यांनी सांगितले.
त्यांच्याकडून कोणतेच उत्तर आले नाही
पुण्यामध्ये (Pune) सर्वाधिक कोरोना रुग्ण असल्याचं अहवालातून समोर आल्यानंतर आम्ही पुण्याला सर्वाधिक लसींचा पुरवठा करण्याबाबत विचारणा केली होती. परंतु केंद्रातील मोदी सरकारने त्यावर काहीच उत्तर दिलं नसल्याचे सायरस पुनावाला म्हणाले.
मुलगा आदर परंपरा कायम ठेवेल
परदेशातल्या कंपन्याची लस जिथे दुप्पट किमतीला मिळते. तीच लस सिरम कमी किमतीत जगभरात उपलब्ध करुन देते. जगात सर्वात स्वस्त कोरोनाची लस सिरमने उपलब्ध केली. मी जर आंतरराष्ट्रीय बाजारभावाप्रमाणे लस विकली असती. तर माझ्या उत्पन्नात खूप भर पडली असती. परंतु आम्ही खूप कमी किमतीत लस दिली आहे. माझ्या कुटुंबाने नफ्याचा त्याग केला आहे. भविष्यातही माझा मुलगा आदर ही परंपरा कायम ठेवेल असा विश्वास सायरस पुनावाला यांनी व्यक्त केला.
Web Title : cyrus poonawalla antibodies to corona were reduced even after both doses of covishield cyrus poonawalla
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Rain in Maharashtra | विकेंडनंतर राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, हवामान खात्याकडून अलर्ट जारी