मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या वातावरणामुळे पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला भारतामध्ये येण्यास प्रवेश मिळणार काय? असा सवाल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) पडला होता. मात्र या निर्माण झालेल्या प्रश्नाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. पाकिस्तानी खेळाडू आणि मीडियाला व्हिसा देण्यासाठी केंद्र सरकार तयार झाल्याची माहिती भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने (BCCI) आयसीसीला दिलीय. असा निर्णय शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेतलं आहे. यामुळे आता येत्या टी-20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान टीम भारतात प्रवेश करू शकणार आहे. परंतु, पाकिस्तानी चाहत्यांना भारतात सामना बघण्यासाठी कोणतीही परवानगी केंद्र सरकारने दिली नाही.
टी- 20 वर्ल्ड कप ही एक जागतिक स्पर्धा आहे. त्यामुळे पाकिस्तानचे खेळाडू आणि मीडियाला भारतामध्ये येण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या विषयावर पुढील काळात या मुद्यावर आणखी चर्चा होणार आहे. अशी माहिती एका बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं दिलीय. या अगोदर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मनी यांनी BCCIला या विषयावरील भूमिका स्पष्ट करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत अल्टीमेटम दिला होता. यानंतर १ एप्रिलला BCCI आणि ICC यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत यावर निर्णय काय होईल याचा तोडगा काढण्याचं आश्वासन BCCI ने दिलं होतं.
या दरम्यान, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेच्या आयोजनाबाबतही या बैठकीत चर्चा झाली आहे. तर एकूण ९ स्टेडियमला या स्पर्धेसाठी तयारी करण्याची सूचना बोर्डानं दिली आहे. सध्या तरी स्पर्धेची फायनल अहमदाबादमध्ये होणार असं निर्णय घेतला आहे. मात्र मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरु, लखनऊ आणि धरमशाला ही ठिकाणं शॉर्टलिस्ट केले आहे. तसेच, या विषयावर अजून अंतिम निर्णय अजून घेतला नाही. दरम्यान, ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातील कोरोनाची स्थिती बघून ठरवण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.