नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात रोज समोर येणारी कोरोना प्रकरणे वाढतच चालली आहेत. मागील एक आठवड्यापासून दररोज तीन लाखांपेक्षा जास्त कोरोना केस समोर येत आहेत. मागील 24 तासात पहिल्यांदा कोरोनाच्या 3 हजारपेक्षा मृतांची नोंद झाली आहे.
एक एप्रिलपासून रोज प्रकरणांची संख्या वेगाने वाढत आहे. जास्त संसर्गजन्य व्हेरिएंटशिवाय एखादे अन्य कारण यापाठीमागे आहे का? याबाबत महिला प्रोफेसर भ्रामर मुखर्जी यांनी ’द हिंदू’ ला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, आपल्याला सतर्क राहावे लागेल. आम्ही सर्व यावर सहमत आहोत की भारतात सध्या जी स्थिती आहे यासाठी अनेक कारक जबाबदार आहेत. जेव्हा संपूर्ण देश खुला करण्यात आला तेव्हा योग्य काळजी घेतली गेली नाही, मोठ-मोठ्या निवडणुक रॅली, धार्मिक आयोजन, क्रिकेट मॅच, सार्वजनिक वाहतूक, मॉल, थिएटर या सर्वांचे योगदान यात आहे, जिथे लोक बिनधास्त जमले होते.
भ्रामर मुखर्जी म्हणाल्या की, आपण सर्व या गैरसमजात राहिलो की, आता आपण सुरक्षित आहोत. आपण या कपटी व्हायरसचा अंदाज घेण्यास अपयशी ठरलो. आपण यास जंगलातील आगीसारखे पसरू दिले. इथपर्यंत की जेव्हा फेब्रुवारीत याचा परिणाम दिसू लागला तरीसुद्धा आपण सत्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा याचा वेग मंद होता तेव्हा आपण व्हॅक्सीनेशनचा वेग वाढवू शकलो नाही.
मिशिगन युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञ म्हणाल्या की, हे सर्व ते कारक आहेत, ज्यामुळे भारतात कोरोनाची प्रकरणे वेगाने वाढली, आम्ही पाहिले की, प्रकरणे 8 पट वेगाने वाढली. कोरोनाने होणारे मृत्यू 9 पट वाढले. प्रोफेसर भ्रामर मुखर्जी यांनी म्हटले, आमच्याकडे आता विविध राज्यांचे आकडे आहेत जे दर्शवतात की, डबल म्यूटंट किंवा युके व्हेरिएंट महाराष्ट्र किंवा पंजाबमध्ये लवकर प्रभावी झाले आहेत. मात्र, योग्य भौगोलिक सिक्वेन्सिंग, टाइम आणि एपिडेमियोलॉजिकल तपासणीशिवाय हे पुरावे अजूनही परिस्थितिजन्य आहेत.
जर नवीन व्हेरिएंटमुळे संसर्ग होत असेल तर 1 एप्रिलपासूनच प्रकरणे वेगाने का वाढत आहेत? या प्रश्नावर प्रोफेसर भ्रामर मुखर्जी म्हणाल्या की, हा या व्हायरसचा स्वभाव आहे. हा गुपचुप पद्धतीने विस्तार करतो आणि खगोलीयदृष्ट्या स्फोट करतो. वाढीचा दर पॅरामीटर धक्कादायक आहे, परंतु पॅटर्नची व्याख्या केली जाऊ शकते. उदाहरणासाठी अमेरिका आणि ब्रिटनमध्ये हे दिसून आले. 1918 इन्फ्लुएंजा महामारीच्या दरम्यान भारतात हा पॅटर्न दिसून आला.
चुकीच्या आकडेवारीने मोठे नुकसान
उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये कोरोना प्रकरणांबाबत प्रोफेसर म्हणाल्या, मी हे पुन्हा सांगते की, सत्य लपवणे किंवा चुकीची संख्या सादर करण्याने कोणतीही मदत मिळणार नाही. अशी रणनिती विवेकपूर्ण धोरण ठरवण्यात अडथळा आणते, योग्य आरोग्य देखभाल गरजा किंवा ऑक्सीजनचा पुरवठा, आयसीयू बेडच्या स्थितीत सुधारणा करण्यात बाधक आहे. ही महामारी भ्रामक धोरणात्मक महामारीत बदलली आहे कारण खरे आकडे सांगितले जात नाहीयेत.
युपी, बंगाल, बिहारला लॉकडाऊनची आवश्यकता
उत्तर प्रदेशात कोरानाचा धोका जास्त झाल्याच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, केवळ युपीमध्येच नव्हे, पश्चिम बंगाल, बिहार, दिल्ली सुद्धा अलर्ट लिस्टमध्ये आहे. यानंतर आंध्र प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ, गुजरात आणि कर्नाटकचा नंबर येतो. केरळची स्थिती पुन्हा चिंताजनक होत आहे. मला वाटते की, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार आणि केरळला लॉकडाऊनची आवश्यकता असेल. ओडिसा आणि आसाममध्ये सुद्धा संसर्ग दर जास्त आहे. परंतु काही प्रकरणात अंदाजित संख्या कमी आहे.
भारतात कोरोनाची दुसरी लाट पीक केव्हा होईल आणि रोज किती प्रकरणे येतील? यावर प्रोफेसर भ्रामर मुखर्जी म्हणाल्या की, सर्वांचा अंदाज आहे की, मेमध्ये कोरोनाची दुसरी लाट पीक होईल. आमचा अंदाज आहे की, कोरोना संसर्ग मेच्या मध्यावर पीक होईल. त्यावेळी रोज 8-10 लाख केस येतील जेव्हा दररोज 4500 लोकांचा जीव जाऊ शकतो.
भारतात सुद्धा तिसरी लाट येऊ शकते का? आपण तिसरी लाट रोखण्यासाठी आवश्यक दैनिक लसीकरणाच्या लक्ष्यापर्यंत पोहचू का? प्रोफेसर भ्रामर मुखर्जी म्हणाल्या, हे या गोष्टीवर अवलंबून आहे की, आपण किती वेगाने लसीकरण करणार आहोत. आपल्याला रोज 1 कोटी लोकांचे लसीकरण करण्याची आवश्यकता आहे. 80 कोटी लोकांच्या लसीकरणासाठी 5 महिने लागू शकतात.
चांगल्या हेल्थ सिस्टमची गरज
भ्रामर मुखर्जी यांचे म्हणणे आहे की, खुप शक्यता आहे की, ही शेवटची लाट नसेल. हा शेवटचा व्हेरिएंट नसेल जो आपण सध्या पहात आहोत. आपण एक सुधारित आणि चांगली हेल्थ सिस्टम तयार करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला या स्थितीला तोंड देण्यासाठी डेटा, विज्ञान आणि मानवता द्वारे संचालित एका चांगल्या सार्वजनिक आरोग्य इशारा प्रणालीची आवश्यकता आहे. आपल्याला आरोग्य सेवा क्षमता, ऑक्सजीन पुरवठा, आयसीयू बेडची निर्मिती जारी ठेवावी लागेल.
भ्रामर मुखर्जी यांच्यानुसार तयारी आणि अंदाज ही कोरोना रोखण्याची गुरुकिल्ली आहे. आपण लसीकरणाची संथ सुरुवात केली आहे. अपेक्षा आहे की धोरणांसह आपण लवरकच व्हॅक्सीनेशन वाढवू शकतो.