नवी दिल्ली : वृत्त संस्था- देशात कोरोनाच्या दुसर्या लाटेचा कहर सुरूच आहे. स्थिती अशी आहे की, मागील 12 दिवसात लागोपाठ 3 लाखांपेक्षा जास्त प्रकरणे समोर येत आहेत. तर एक दिवसात कोरोनाचा हा आकडा चार लाखांच्या सुद्धा पुढे गेला होता. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांदरम्यान रविवारी थोडा दिलासा दिसून आला. देशात मागील 24 तासात कोरोनाचे 3 लाख 50 हजार 598 रूग्ण समोर आले, तर या दरम्यान 3,071 रूग्णांचा मृत्यू झाला.
मागील 24 तासात 2 लाख 79 हजार 882 रूग्ण बरे होऊन घरी गेले. नवीन रूग्ण समोर आल्यानंतर एकुण संक्रमित रूग्णांची संख्या दोन कोटीच्या जवळ पोहचणार आहे. देशातील 12 राज्यात संसर्गाची स्थिती सर्वात गंभीर आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, 150 जिल्ह्यांमध्ये संसर्गाचा दर 15 टक्केपेक्षा सुद्धा जास्त आहे, तर 250 जिल्ह्यांमध्ये संसर्गाचा दर 10 ते 15 टक्केच्या दरम्यान आहे.
देशात कोरोनाने सर्वात जास्त प्रभावित महाराष्ट्र दिसत आहे. महाराष्ट्रात रविवारी कोविड-19 ची 56,647 नवीन प्रकरणे समोर आली तर आणखी 669 लोकांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागानुसार, नवी प्रकरणांसह एकुण संक्रमितांची संख्या 47,22,401 आणि एकुण मृतांची संख्या 70,284 झाली आहे. मागील 24 तासात 51,356 रूग्णांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले. राज्यात 6,68,353 उपचाराधीन रूग्ण आहेत तर आतापर्यंत 39,81,658 लोक संसर्गातून बरे झाले आहेत.
मुंबईत कोरोनाची 3,672 नवी प्रकरणे
मुंबईतून कोविड-19 ची 3,672 नवीन प्रकरणे समोर आल्याने एकुण संक्रमितांची संख्या 6,56,204 झाली. या दरम्यान संसर्गाने आणखी 79 रूग्णांचा मृत्यू झाल्याने एकुण मृतांची संख्या 13,330 झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) एका वक्तव्यात सांगितले की, मुंबईत 57,342 उपचाराधीन रूग्ण आहेत. मागील 24 तासात 28,636 नमून्यांची चाचणी करण्यात आली.
बिहारमध्ये सुशील मोदी यांच्या भावाचे निधन
बिहारमध्ये 24 तासात कोविड-19 ने माजी उपमुख्यमंत्री तसेच भाजपा राज्यसभा सदस्य सुशील मोदी यांच्या छोट्या भावासह 97 लोकांचा मृत्यू झाला. तसेच संसर्गाची 13,534 नवी प्रकरणे समोर आली आहे. उत्तर प्रदेशात मागील 24 तासात 290 मृत्यू तर 30,983 नवे कोरोना रूग्ण सापडले आहेत.