मुंबई : वृत्तसंस्था – मुंबई हायकोर्टाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे, त्यानुसार जर एखादा पुरुष असे सांगून महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करत असेल की तो फक्त त्या महिलेशिवाय दुसऱ्या कुणावरच प्रेम करत नाही, मग ती महिलेची संमती मानली जाणार नाही. उच्च न्यायालयाने पुढे म्हटले की, अशा आश्वासनावर संबंध जोडणे हे बलात्काराच्या श्रेणीत येईल.
बलात्कार प्रकरणातील एका व्यक्तीची याचिका फेटाळताना न्यायमूर्ती सुनील शुकरे आणि माधव जामदार यांनी हा आदेश सुनावला आहे. आरोपीच्या म्हणण्यानुसार, त्याने महिलेशी तिच्या संमतीने संबंध ठेवले होते. त्या पुरुषाने असे सांगितले की, त्याचा या महिलेशी प्रेमसंबंध होता आणि त्या महिलेनेही शारीरिक संबंध निर्माण करण्यास सहमती दर्शविली होती.
त्या महिलेने उत्तरात म्हणले आहे की, तिने ही संमती चुकीच्या धारणेने दिली आहे, कारण पुरुषाचे आश्वासन खोटे होते. या महिलेने सांगितले की, त्या व्यक्तीने असे सांगून फसवले होते की तो फक्त तिच्यावर प्रेम करतो आणि दुसऱ्या कुणावरच नाही. काही वेळानंतर दोघांनी ब्रेकअप केले.
या खटल्याची सत्यता पाहता खंडपीठाने म्हटले आहे की, जर महिलेने पुरुषावर केलेल्या आरोपांना पाहिले तर पुरुषाने असे सांगून तिच्याशी संबंध बनवले होते की त्याचे प्रेम महिलाप्रती खरे आहे.
तथापि पुरुषाने महिलेस लग्नाबाबत कसलेही आश्वासन दिले नव्हते. परंतु हे देखील सत्य आहे की महिलेने लग्नाआधी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास नाकार दिला होता.
त्यानंतर त्या पुरुषाने तिला समजावण्याचा प्रयत्न केला की तो फक्त त्या महिलेवरच प्रेम करतो. पुरुषाच्या अशा बोलण्यानंतर ती महिला त्याच्याशी संबंध बनवण्यास तयार झाली.
खंडपीठाने पुढे म्हटले आहे की, ही महिला लैंगिक संबंधांमध्ये गुंतली नाही कारण तिचे आरोपीवर मनापासून प्रेम होते, परंतु हे एक असे प्रकरण आहे, ज्यात अशा संबंधात प्रवेश करण्याचे प्रलोभन देण्यात आले होते. या कारणामुळे न्यायाधीशांनी पुरुषाच्या याचिकेस फेटाळून लावले.