बहुजननामा ऑनलाइन टीम – भारताने सोमवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानचे नाव न घेता म्हटले आहे की जागतिक स्तरावर ज्या देशांना दहशतवादाचे ( terrorism)प्रायोजक मानले जाते त्यांनी कोविड-19 साथीच्या रोगाचा उपयोग दहशतवाद्यांची भरती आणि घुसखोरी करण्यासाठी केला कारण ‘दहशतवादाचे विष’ पसरवले जाऊ शकेल.
यासोबतच भारताने म्हटले की, भारत आणि इतर देशांनी जागतिक आरोग्य संकटाच्या या काळात लसीकरण मोहीम राबविली आणि इतरांना मदत केली. संयुक्त राष्ट्रातील स्थायीचे उप प्रतिनिधी नागराज नायडू यांनी सुरक्षा परिषदेत ‘आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा: 2532 प्रस्तावाची अंमलबजावणी’ या विषयावर आयोजित बैठकीला संबोधित करताना असे सांगितले.
नायडू म्हणाले, “साथीच्या काळात भारतासारख्या देशांनी जिथे लसीकरण मोहीम राबविल्या आणि इतरांना मदत केली, तिथे असे काही देश आहेत की जे दहशतवादाला समर्थन देत आहेत आणि द्वेषाची भाषा करत असून खोट्या प्रचारात गुंतले आहेत.”