बहुजननामा ऑनलाईन टीम : मध्यप्रदेशात कॉंग्रेसची सत्ता येण्याआधी भाजपचे सरकार होते. आपल्याच पक्षाचे सरकार असल्याने मला काही गोष्टी बोलचा यायच्या नाहीत मात्र, इंदूरमधील जनहिताचे प्रश्न उपस्थित करायला हवेत, असे मला कायम वाटत होते. त्यावेळी मी कॉंग्रेसची मदत घेत होते. त्यांच्या माध्यमातून अनेकदा जनतेच्या जिव्हाळ्याचे मुद्दे उचलत होते, असे मत राज्यपाल लालजी टंडन यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केले. महाजन यांनी लोकसभेत आठ वेळा इंदूरचं प्रतिनिधीत्व केलं आहे.
राज्यात भाजपाचं सरकार असताना महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यासाठी काँग्रेस नेत्यांची मदत घ्यायचे, असं लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सांगितलं. भाजपा खासदार असल्यानं आणि राज्यात भाजपाचीच सत्ता असल्यानं मला अनेक गोष्टी बोलता यायच्या नाहीत. इंदूरच्या समस्या आणि प्रश्न उपस्थित करण्यासाठी मी कॉंग्रेस नेत्यांना द्यायचे. इंदूरच्या विकासासाठी मी अशा प्रकारे काम केले. इंदूरचा विकास हाच ध्यास असल्याने पक्षीय राजकारण कायम बाजूला ठेवले असे देखील त्यांनी सांगितले.
भाजपाचे शिवराजसिंह चौहान यांनी २००५ ते २०१८ या कालावधीत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले. गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपाला पराभव पत्करावा लागला. यानंतर मध्य प्रदेशमध्ये कॉंग्रेसचे सरकार आले. इंदूर लोकसभा मतदारसंघातून सलग आठ वेळा विजयी झालेल्या व ७६ व्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या सुमित्रा महाजन यांना नवव्यांदा लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती आणि त्या सहज विजयीही झाल्या असता. उमेदवारी नाकारल्यास त्यांना सन्मानाने निवृत्ती हवी होती. त्यामुळे सुमित्रा महाजन यांनी यंदा लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. यानंतर शंकर लालवाणी यांनी इंदूरमधून निवडणूक लढवत लोकसभा गाठली.
Visit : bahujannama.com