सांगलीः बहुजननामा ऑनलाईन – मासे पकडण्यासाठी गेलेल्या तिघा भावडांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू ( Death ) झाला आहे. मृतामध्ये दोघे सख्खे भाऊ तर एका चुलत भावाचा समावेश आहे. सांगली येथे रविवारी (दि. 6) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली असून जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तिघांपैकी एकाचा मृतदेह ( Corpses) सोमवारी (दि. 7) सकाळी हाती लागला आहे. अद्याप दोघांचे मृतदेह ( Corpses ) सापडले नाहीत.
विजय अंकुश व्हनमाने, आनंदा अंकुश व्हनमाने, वैभव लहू व्हनमाने असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, टेंभू योजनेचे पाणी घाणंद तलावात आले आहे.
तलाव भरून सांडव्यावरून बाहेर पडलेले पाणी कालव्यातून आटपाडीकडे येते.
त्याला लागूनच अंकुश व्हनमाने आणि लहू व्हनमाने या दोघा सख्ख्या भावांची शेती आहे.
रविवारी दुपारी 3 च्या सुमारास विजय, आनंदा आणि त्यांचा चुलतभाऊ वैभव तिघेही घरातील कुत्रेसोबत घेऊन मासेमारीसाठी गेले होते.
सायंकाळी 6 पर्यंत ते घरी परतले नसल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरु केली.
रात्री आठच्या सुमारास घाणंद तलावातील कालव्याजवळ विजय आणि आनंदा यांची कपडे, चप्पल सापडल्या. तसेच जवळच कुत्र्याचा मृतदेह कालव्याच्या पाण्यात सापडला.
तर वैभव याची काहीच माहिती लागली नाही.
गावकऱ्यांनी या घटनेची माहिती आटपाडी पोलीस अन् महसूल प्रशासनाला दिली.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सचिन मुळीक, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस अन् ग्रामस्थांनी पाण्यात बराच वेळ शोधाशोध केली.
मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने मुलांचा शोध लागला नाही.
त्यानंतर सांगलीहून आलेल्या पाणबुड्या दाखल झाल्या होत्या.
अंधारातच पाणबुड्यानी शोध सुरु केला. आज सकाळी रेस्क्यू टीमने शोध मोहीम सुरू केली आहे. तीन भावापैकी वैभव व्हनमानेचा मृतदेह सापडला आहे.
तर अंकुश व्हनमाने आणि लहू व्हनमाने या दोघा सख्ख्या भावांचे मृतदेह अद्याप सापडले नाहीत.
कृपया हे देखील वाचा:
‘या’ कारणामुळं तब्बल 27 वर्षांनंतर बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी घेतला घटस्फोट, जाणून घ्या
अहमदनगर ! काय सांगता ! होय, पोलिस कर्मचार्यानं सहकारी महिलेला मिठीत घेण्याचा केला प्रयत्न, अन्…
आज कोणते चलन तुम्हाला बनवणार ‘मालामाल’, ‘इथं’ तपासा संपुर्ण यादी
Income Tax विभाग आज लाँच करणार नवीन वेबसाइट, टॅक्सपेयर्सला मिळतील ‘या’ सुविधा; जाणून घ्या