नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात यंदाच्या आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लोकांची परिस्थिती बिकट करून टाकली आहे. तर यंदाची लाट अधिक तीव्र असून रुग्णाची संख्या अधिक वाढली आहे. तसेच मृत्यूचे प्रमाण देखील प्रचंड आहे. तर यंदाची दुसरी लाट ओसरणार कधी असा प्रश्न लोकांमध्ये उपस्थित होत आहे. तर हि लाट जुलैपर्यंत ओसरण्याची शक्यता आहे. वर्तवली जात आहे. तसेच तिसऱ्या लाटेबाबतही इशारा दिला गेला आहे. असे शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार समोर आले आहे.
भारत सरकारच्या विज्ञान मंत्रालयांतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने स्थापन केलेल्या शास्त्रज्ञांच्या ३ सदस्यांच्या पॅनलने कोरोना विषाणूची दुसरी लाट कधी संपणार आणि तिसरी लाट भारतात कधी येईल, असा अंदाज यांच्याकडून वर्तवण्यात आला आहे. SUTRA मॉडेलचा वापर करुन शास्त्रज्ञांनी अशी भविष्यवाणी केली आहे, की मे महिन्याच्या अखेरपर्यंत दररोज साधारण १.५ लाख कोरोना बाधित रुग्ण सापडतील. तसेचच जून महिन्यापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊन २० हजार पर्यंत जाईल असा अंदाज अभ्यासानुसार वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, केरळ, सिक्कीम, उत्तराखंड, गुजरात, हरियाणा, दिल्ली आणि गोवासारख्या राज्यात बाधितांची संख्या जास्त आहे. अशी माहिती पॅनलच्या एक सदस्य तसेच IIT कानपूरचे प्रा. मनिंद्र अग्रवाल यांनी दिली आहे. या दरम्यान, मॉडेलनुसार असे सांगण्यात आले आहे की, ६ ते ८ महिन्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, प्रा. अग्रवाल म्हणतात की, यामध्ये जास्त लोक प्रभावित होणार नाहीत कारण तोवर बहुतेकांना लस दिली गेली असेल. की कमीत कमी ऑक्टोबर २०२१ पर्यंत तिसरी लाट येणार नाही. असे त्यांनी सांगितलं आहे.