नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या महामारीने देशात थैमान घातले आहे. दररोज साडेतीन लाखांच्या वर रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णांची संख्या वाढत असल्याने वैद्यकीय सुविधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. याच दरम्यान प्राध्यापक विद्यासगर यांनी एक भविष्यवाणी केली आहे. जर विद्यासागर यांची भविष्यवाणी खरी ठरली तर ती देशासाठी मोठी दिलासादयक बाब ठरेल. कारण या आठवड्याच्या अखेर देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पीकला पार करेल.
7 मे ला पीकवर असेल
कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे संपूर्ण देश भीतीच्या सावटाखाली जगत आहे. अशात कोविड-19 बाबत भविष्यवाणी करणारे सरकारचे मॅथमॅटिकल मॉडलिंग एक्सपर्ट प्रो. एम. विद्यासागर म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट 7 मे ला पीकवर असेल म्हणजे यावेळी जास्त रुग्ण असतील. त्यामुळे हेल्थ सेक्टरने या तारखेसाठी तयार राहयाल पाहिजे.
आठवड्याच्या शेवटी रुग्णसंख्येत घट
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विद्यासागर यांनी सांगितले की, जर पूर्णपणे पहिलं तर या आठवड्याच्या अखेरला कोरोनाच्या केसेस कमी होणं सुरु होईल. कोरोना 7 मे ला पीकवर असेल. इथून कोरोनाच्या केसस कमी होण्यास सुरुवात होईल. पण ही लाट वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवगेळ्या पीकवर असेल. संयुक्त रुपाने पाहिले तर कोरोना लाट एकतर पीकवर आहे किंवा त्याच्या एकदम जवळ आहे.
प्रा. विद्यासागर म्हणाले, हे समजून घेण्यासाठी आम्ही साधारण सात दिवसांचा कालावधी घेतो. कारण पीडीतांची संख्या रोज कमी-जास्त होत असते. त्यामुळे आपण केवळ रॉ नंबर्स बघू नये. तर रोजच्या केसेस सरासरीवरही लक्ष दिले पाहिजे. विद्यासागर यांनी असा दावा केला आहे की, हे आकडे या आठवड्यापासून कमी होणं सुरु होईल. त्यांचा अंदाज जर बरोबर ठरला तर ही देशासाठी मोठी दिलासा देणार बाब ठरेल.
डिक्लाइनही स्लो होईल
ते पुढे म्हणाले, वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या वेळेला कोरोना पीकवर असेल आणि त्यानंतर यामध्ये घट होण्यास सुरुवात होईल. ज्या प्रमाणे महाराष्ट्रामध्ये पहायला मिळत आहे. दुसऱ्या लाटेची सुरुवात महाराष्ट्रातून झाली होती. जे राज्य महाराष्ट्रापासून दूर आहेत. ते हळूहळू पीकवर येतील आणि त्याचा डिक्लाइनही स्लो होईल. मात्र जे राज्य महाराष्ट्राच्या जवळ आहेत तेथे कोरोनाचा पीकवर लवकर येईल आणि धोका देखील कमी होईल, असा दावा विद्यासागर यांनी केला आहे.
महिना अखेर रुग्णसंख्या कमी होईल
विद्यासागर यांनी दावा केला आहे की, भारतात एकूण केसेस या आठवड्यात पीकवर असतील. जास्तीत जास्त पुढील 10 ते 15 दिवसात भारतातील प्रत्येक राज्य पीकवर असेल आणि तेथूनच कोरोनाच्या केसेस कमी होण्यास सुरुवात होईल. कोरोनाची दुसरी लाट संपण्यास किती वेळ लागेल, यावर बोलताना विद्यासागर म्हणाले, जर आपण पहिल्या आणि दुसऱ्या लाटेची तुलना केली तर आपल्याला लक्षात येईल की, गेल्यावेळी याचा वेग कमी होता. पहिल्या लाटेला पीकवर येण्यासाठी साडेतीन महिने लागले होते आणि या केसेस हळू हळू कमी झाल्या होत्या.
वेगाने रुग्णसंख्या कमी होईल
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नजर टाकली तर दिसून येते की, 1 एप्रिलला आपल्याकडे 75 हजार केसेस होत्या. पण ठीक एक महिन्यानंतर आपण 4 लाखांचा आकडा पार केला. आम्हाला आशा आहे की, दुसरी लाट जेवढ्या वेगाने वर गेली तेवढ्याच वेगाने खाली येईल. मे च्या अखेरपर्यंत भारतामध्ये साधारण 1.2 लाख कसेसे असतील असं चित्र असेल. यामुळे याचा अर्थ असा होत नाही की, कोरोनाच्या केसेस संपतील.
डिक्लाइन योजनांवर अवलंबून
अशोका युनिव्हर्सिटीचे बायोलॉजीचे प्रा. गौतम मेनन यांचा अंदाज आहे की, कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे या महिन्याच्या मध्यात पीकवर असले. ब्राऊन यूनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे डीन डॉ. आशीष झा यांना विद्यासागर यांनी वर्तवलेला अंदाज योग्य वाटत नसल्याचे म्हटले. ते म्हणाले, कोरोनाचा डिक्लाइन योजनांवर अवलंबून आहे. जर तुमची योजना प्रभावशाली असेल तर वाढणाऱ्या केसेस कंट्रोल केल्या जाऊ शकतात. अशावेळी केसेस कमी होतील. जर असं झालं नाही तर अनेक देशांचा अनुभव हे सांगतो की, पीकवर असल्यावर हळुवार केसेस कमी होतात. ज्यात काही महिन्यांचा वेळ लागतो.