मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोना बाधित रुग्ण संख्येने सात लाखांचा टप्पा ओलांडला असून राज्यातील कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वेगाने वाढत असल्याने दिलासा मिळत आहे. गेल्या 24 तासात 12 हजार 300 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजपर्यंत राज्यात 5 लाख 14 हजार 790 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 73.14 टक्के इतके आहे.
10,425 new #COVID19 cases and 329 deaths reported in Maharashtra today. The total number of positive cases now stands at 7,03,823 including 5,14,790 recoveries and 1,65,921 active cases: State Health department pic.twitter.com/nHeBA1BP7h
— ANI (@ANI) August 25, 2020
राज्यात रुग्ण बरे होत असताना रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. गेल्या 24 तासात राज्यात 10 हजार 425 नवीन रुग्णांची भर पडली असून राज्याने 7 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 7 लाख 3 हजार 823 इतकी झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 18.89 टक्के इतके आहे. रुग्ण संख्या वाढण्याबरोबरच मृतांची संख्या देखील वाढली आहे. गेल्या 24 तासात 329 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्य झाला असून राज्यातील मृत्युचे प्रमाण 3.24 टक्के इतके आहे.
सध्या राज्यात 1 लाख 65 हजार 921 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. या रुग्णांवर राज्यातील विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. आजपर्यंत 37 लाख 24 हजार 911 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 7 लाख 3 हजार 823 जणांची कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या 12 लाख 53 हजार 723 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 33 हजार 668 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.