मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला महाविकास आघाडीकडून पत्रकार परिषदेत घेऊन उत्तर देण्यात आले. यावेळी केंद्र सरकारकडून मिळालेल्या मदतीचे दावे फेटाळण्यात आले. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली. यानंतर भाजपा नेत्यांकडूनही महाविकास आघाडी सरकारला प्रत्युत्तर दिले जात असून शाब्दिक चकमक रंगली आहे. एकास तीन हे तर रडव्यांचे लक्षण! करुन दाखवा, रडून नको असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.
विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्राला काय मिळेल आणि कसे मिळेल हे सांगितले त्यावर ऐवढी का कळ पोटात गेली.एका माणसाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला "आघाडीची तीन माणसं" धावली.घाबरताय कशाला?तुमचं अपयश,नाकर्तेपणा उघड होतो त्याला? एकास तीन हे तर भित्रे,रडव्यांचे लक्षण! करुन दाखवा,रडून नको! 1/8
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 27, 2020
आशिष शेलार यांनी एकामागोमाग एक असे आठ ट्विट करत राज्य सरकारवर टीका केली आहे. विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्राला काय मिळेल आणि कसे मिळेल हे सांगितले त्यावर एवढी का कळ पोटात गेली?. एका माणसाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला आघाडीची तीन माणसे धावली. घाबरताय कशाला? तुमचे अपयश, नाकर्तेपणा उघड होतो त्याला? एकास तीन हे तर भित्रो,रडव्यांचे लक्षण! करुन दाखवा, रडून नको!, असे त्यांनी म्हटले आहे.
आघाडीची "तीन माणसं" बोलली कि रडली..? कोरोना आल्यापासून हे असेच रोज रडणे सुरु आहे. कधी केंद्राच्या नावाने रडायचे.. अधी विरोधी पक्षाच्या नावानं.. आता थाबवा ही तुमची रडगाणी.. आता करुन दाखवा ना! तुम्ही मदत द्या.. शेतकऱ्यांना पँकेज द्या.. कोरोनापासुन महाराष्ट्राला वाचवा! रडू नका!! 3/8
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 27, 2020
महाराष्ट्रात सर्व आलबेल असल्याचे, आभासी चित्र निर्माण करणार्या आघाडीच्यातीन माणसांच्या दाव्यांचा पर्दाफाश पत्रकारांनी केला. पहिल्या प्रश्नातच मुंबईतील अपयश उघडे झाले आणि तीन माणसे एकमेकाकडे बघत बसले! आभासी फुगा जागीच फोडणार्या पत्रकारांचे आभार. आघाडीची तीन माणसे बोलली कि रडली..? करोना आल्यापासून हे असेच रोज रडणे सुरु आहे. कधी केंद्राच्या नावाने रडायचे.. अधी विरोधी पक्षाच्या नावाने . आता थांबवा ही तुमची रडगाणी.. आता करुन दाखवा ना! तुम्ही मदत द्या.. शेतकर्यांना पँकेज द्या.. कोरोनापासुन महाराष्ट्राला वाचवा! रडू नका, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.
महाराष्ट्र द्रोही तर तुम्ही आहात..तुमची निष्क्रियता महाराष्ट्राचे नुकसान करतेय..महाराष्ट्राला मागे घेऊन जातेय. तुमच्या निष्क्रियतेने गिप्ट सीटी महाराष्ट्राने गमावली..सांगली ऐवजी अफ्रिकेत ऊस पिकवणे हा महाराष्ट्र द्रोह नव्हे काय?
आता उद्योग महाराष्ट्रात येऊ नयेच असे का वागताय? 5/8— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 27, 2020
आघाडीच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस असून नसल्यासारखे वाटले. बहुतेक पक्षाचे प्रमुख राहुल गांधी यांची सुचना तंतोतंत पाळली.
पळकुटी भूमिका आज पण दिसली!काँग्रेस पळुन दाखवतेय… किमान
बाकीच्यांनी रडून नको करून दाखवा! 8/8— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 27, 2020