नवी दिल्ली : देशात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असून दर दिवशीचा नवीन रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. गेल्या २४ तासात देशभरात १४ हजार २६४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर ९० जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात ११ हजार ६६७ रुग्णांना घरी सोडण्यात आले. देशभरात सध्या १ लाख ४५ हजार ६३४ सक्रीय रुग्ण आहेत.
महाराष्ट्रात सलग तिसर्या दिवशी ६ हजारांहून अधिक नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. शनिवारी राज्यात ६ हजार २८१ नवीन रुग्ण आढळले. महाराष्ट्रात सध्या ४९ हजार ६३० सक्रीय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
India reports 14,264 new #COVID19 cases, 11,667 discharges, and 90 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 1,09,91,651
Total discharges: 1,06,89,715
Death toll: 1,56,302
Active cases: 1,45,634Total Vaccination: 1,10,85,173 pic.twitter.com/T805gzUDZz
— ANI (@ANI) February 21, 2021
महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्ये ४ हजार ६५० नवीन रुग्ण आढळून आले. देशातील सर्वाधिक ५८ हजार ८८३ सक्रीय रुग्ण केरळमध्ये आहेत. कर्नाटकमध्ये शनिवारी ४९० तर तामिळनाडुमध्ये ४९० रुग्ण आढळून आले आहेत. पंजाब ३५२, छत्तीसगड २६३, मध्य प्रदेश २५७, गुजरात २५८ नवीन रुग्ण वाढले आहेत.