नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रातील पुण्यात कोरोनाने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या ५ असून या रुग्णांच्या तपास अहवालात कोरोना व्हायरस पॉजिटीव्ह दाखवला आहे. सगळ्या रुग्णांना आयजोलेशन वॉर्डमध्ये ऍडमिट केले असून त्यांच्यावर उपचार सुरु केले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी तीन लोकांची चाचणी करण्यासाठी मुंबईच्या कस्तुरबा गांधी रुग्णालयात ऍडमिट केले गेले आहे.
बाधित भागातून आतापर्यंत ५९१ प्रवासी महाराष्ट्रात आले असून त्यापैकी ३०४ लोकांना ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे होती. या सर्वांवर आयजोलेशन केंद्रात उपचार सुरू होते. दाखल झालेल्यांपैकी २८९ लोकांना कोरोना नकारात्मक आहे. तसेच ५ लोक कोरोना विषाणूमुळे ग्रस्त असून मिळालेल्या माहितीनुसार ३०४ पैकी २८९ लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर १२ जणांवर उपचार सुरू असून ६ जणांना मुंबईतील कस्तूरबा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
त्याच बरोबर १० मार्चपर्यंत भारतात कोरोना विषाणूची ४७ प्रकरणे नोंदली गेली. या विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. या बैठकीत दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन तसेच केंद्र आणि दिल्ली सरकारचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर झालेल्या परिषदेत , “आता आपण चांगल्या स्थितीत आहोत कारण पहिलेच तयारी केली होती. आम्ही लाखो प्रवाशांची तपासणी करत आहोत. रुग्णांच्या तपासणीसाठी ४६ प्रयोगशाळांमध्ये नमुने तपासले जात आहेत. मास्क केवळ संक्रमित रूग्णांसाठीच आवश्यक आहे, त्याबद्दल असलेल्या अफवांकडे लक्ष देऊ नका,” असे डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले.