नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूबद्दलही भारत सावध झाला असून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी त्याबद्दल माहिती दिली आहे. दिल्लीमध्ये कोरोना विषाणूच्या २८ घटना आजपर्यंत सापडल्या असून या प्रकरणांपैकी केरळचे ३ रुग्ण बरे झाले आहेत. आता परदेशातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली जाणार आहे. यापूर्वी केवळ १२ देशांसोबत हे सल्लागार चालू होते.
या व्हायरसपासून वाचण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने तयारी सुरु केली आहे. बुधवारी सकाळी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मिळून बैठकीचा आणि तयारीचा आढावा घेतला. केंद्रीय मंत्र्यांनी बुधवारी जाहीर केले की, आतापर्यंत १५ लॅबमध्ये कोरोना व्हायरसची चाचणी होत होती. आता सरकारकडून आणखी १९ लॅब बनवल्या जाणार आहेत.
आरोग्य मंत्र्यांनुसार आतापर्यंत २८ प्रकरणे समोर आली आहेत. केरळमध्ये तीन प्रकरणे आली असताना ते आता बरे झाले आहे. दिल्लीतील एक प्रकरण होते ज्यामुळे ६ नातेवाईकांनाही त्याचा फटका बसला आहे. तेलंगणामध्येही एक प्रकरण समोर आले होते.
सीधा प्रसारण !! कोरोनावायरस पर भारत की तैयारियों को लेकर डॉ हर्ष वर्धन, केंद्रीय स्वास्थ्य व परिवार कल्याण मंत्री की प्रेस वार्ता https://t.co/JGwFUa3ym0
— DrHarshVardhanOffice (@DrHVoffice) March 4, 2020
भारतात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची होणार तपासणी
या व्हायरसबद्दल डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी भारतात येणाऱ्या सगळ्या परदेशी नागरिकांची तपासणी होणार असल्याची माहिती दिली. पहिले फक्त १२ देशातील लोकांची तपासणी केली जात होती. राज्य सरकारसोबत मिळून घेतला आहे की, हॉस्पिटलमध्ये सुविधा देण्याचा आदेश देण्यात आला.
Delhi: Union Health Minister Dr Harsh Vardhan takes a meeting with senior officials from Delhi Government for the management & preparedness of #Coronavirus. pic.twitter.com/EQcTqjmJEL
— ANI (@ANI) March 4, 2020
बुधवारी डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनके अधिकारी सहभागी झाले होते. सोबतच दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांनीही बैठकीत भाग घेतला होता. या बैठकीत कोरोना व्हायरसपासून वाचणे, रुग्णालयांमधील सुविधा आणि इतर मुद्द्यांवर चर्चा झाली. आतापर्यंत भारतात कोरोना विषाणूची एकूण १८ प्रकरणे नोंदविली गेली असून त्यापैकी १५ प्रकरणे त्यांची आहेत जे इटलीमधून भारत भेट देण्यासाठी आले होते. या सर्वांची तपासणी होत आहे. तसेच आयटीबीपी त्यांना सेंटरमध्ये नेण्यात आले आहे जिथे कोरोना विषाणूचे कॅम्प सुरू आहे. भारत सरकार, दिल्ली सरकारच्या वतीने अनेक रूग्णालयात कोरोना विषाणूच्या रूग्णांसाठी बेड रिजर्व ठेवले असून अनेक सावधगिरी बाळगल्या गेल्या आहेत.