सातारा : बहुजननामा ऑनलाइन – चीनमधील वुहानमध्ये पत्नीला एकटे सोडून पती त्याच्या मायदेशी परतला असून त्याने पत्नीला एकटेच सोडले आहे. चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून साताऱ्यातून चीनला लग्न करुन गेलेली तरुणी अडकली आहे. या तरुणीचे नाव अश्विनी पाटील असे असून मागील आठ महिन्यांपासून अश्विनी आणि तिचा पती वुहान येथेच राहत होते.
अश्विनीने व्हिसाच्या कामासाठी पासपोर्ट दिला असताना परत येण्याअगोदरच वुहान शहरात शटडाऊन करण्यात आल्याने तिला तिचा पासपोर्ट मिळाला नाही. या दरम्यान तिचा पती पोलंडला असताना आजारी पडला. त्याने पोलंड सरकारला मायदेशी येऊन उपचार मिळावेत, अशी विनंती केली. तसेच पोलंड सरकारने विशेष विमान पाठवत अश्विनीच्या पतीला मायदेशी नेले आणि पासपोर्ट नसल्यामुळे अश्विनी वुहानमध्येच अडकली.
अश्विनी पाटील यांनी भारत सरकारकडे विनंती करत वुहानमधून आपली सुटका करावी, अशी मागणी केली आहे. २३ जानेवारी २०२० पासून वुहान शहर बंद करण्यात आले असून त्यामुळेच वुहानमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे नुकसान झाले आहे.