मुंबई ,बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रासाठी १ चांगली बातमी समोर येत आहे ती म्हणजे महाराष्ट्रात झालेल्या कोरोना चाचण्यांमधून ९४ टक्के रिपोरेस हे निगेटिव्ह आले आहे. हि माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी विभागाने सादर केली आहे . त्यामुळे थोडा का होईना महाराष्ट्राने सुटकेचा श्वास सोडला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आत्त्तापर्यंत र्राज्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले असून राज्यात दररोज ७ हजारांपेक्षा जास्त चाचण्या घेतल्या जातात. तसेच राज्यात चाचण्यांची संख्या हि जास्त असल्याने रुग्णांचे निदान लवकरात लवकर होण्यास मदत होत आहे. मंगळवारपर्यंत राज्यात ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ जणांचे रिपोर्स निगेटिव्ह आले आहेत तर ५२१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत राज्यात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला आहे.
आयसीएमआर यांच्या सूचनांनुसार राज्यात कोरोना प्रतिबंध उपचार केले जात आहेत. राजेश टोपे यांनी महाराष्ट्राला घाबरून न जाण्याचा सल्ला दिला आहे तसेच महाराष्ट्र हे १४ हॉटस्पॉट वरून फक्त ५ वर आले आहे असे देखील त्यांनी सांगितले तसेच मुंबई मध्ये वाढती कोरोना रुग्णनाची संख्या लक्षात घेता क्वारंटाईन हा बेस्ट पर्याय असल्याचे टोपे यांनी सांगितले तसेच शाळा आणि काही संस्थानचा क्वारंटाईन रुग्ण ठेवण्याकरिता वापर करणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.