अमरावती : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने राज्यात 15 मे पर्यंत लॉकडाऊन केले आहे. कोरोना संसर्गाचा वाढता वेग बघता रेल्वे बोर्डाने मोठा निर्णय घेतला आह. महाराष्ट्रातून धावणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सीएसएमटी ते मनमाड (02109), मनमाड ते सीएसएमटी ( 02110), मुंबई ते अमरावती ( (02111), अमरावती ते मुंबई ( 02112), पुणे ते नागपूर (02113), नागपूर ते पुणे (02114), मुंबई ते सुरत (02115), सुरत ते मुंबई (02116), पुणे ते अमरावती (02117), अमरावती ते पुणे (02118), डीआर ते एसएनएसआय (02147) एसएनसएसआय ते डीआर (02148), मुंबई ते नागपूर (02189), नागपूर ते मुंबई (02190), मुंबई ते लातूर (02207), लातूर ते मुंबई (02208), पुणे अजनी (02223), अजनी ते पुणे (02224), पुणे ते अजनी (02239), अजनी ते पुणे (02240), मुंबई ते जालना (02271), जालना ते मुंबई (02272) या गाड्या 10 मे पासून धावणार नाहीत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.