नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केरळ आणि महाराष्ट्रामध्ये 100 पेक्षा जास्त लोकांना कोरोना वायरसची लागण झाल्याची शंका निर्माण झाल्याने त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाने चीनमध्ये घातक कोरोना वायरसच्या वाढत्या प्रकरणाची दखल घेऊन चिंता व्यक्त केली आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी भारताने तयारीचा आढावा घेतला. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले की, आतापर्यंत या आजाराचे कोणतेही ठोस प्रकरण समोर आलेले नाही. परंतु, चीनहून आलेल्या सात लोकांचे नमूने पुण्याच्या आयसीएमआर-एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. यापूर्वी चार अन्य प्रवाशांच्या नमून्यांच्या तपासणीत हा वायरस आढळलेला नाही.
आरोग्य मंत्रालय सांगितले की, हर्षवर्धन यांच्या निर्देशानंतर या आजाराशी संबंधित चोवीस तास सुरू असलेले कॉल सेंटर (+91-11-23978046) सुरू करण्यात आले आहे. केरळच्या एका वरिष्ठ आरोग्य अधिकार्याने सांगितले की, राज्यात 172 लोकांना घरी आणि विविध रूग्णालयांमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. अधिकार्यांनी सांगितले की, कोरोना वायरसच्या संपर्कात आल्याच्या शंकेमुळे मुंबईच्या एका रूग्णालयात भरती करण्यात आलेल्या तीन लोकांमधील दोघांना संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, सावधगिरी म्हणून त्यांना अजूनही देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तर तिसर्या व्यक्तीच्या रक्ताच्या नमुण्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.
मुख्य सचिव पी के मिश्रांच्या अध्यक्षतेखाली बैठक
सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधानांचे सचिव पी के मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आरोग्य मंत्रालयाच्या अधिकार्यांनी चीनमध्ये कोरोना वायरस पसरण्याचे प्रकरण समोर आल्यानंतर उचलण्यात आलेल्या पावलांची माहिती या बैठकीत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानंतर ही बैठक झाली. कॅबिनेट सचिव, गृह सचिव, परराष्ट्र सचिव, संरक्षण सचिव, आरोग्य सचिव, नगरी विमान सचिव आणि अन्य अनेक अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
20 हजार लोकांची वैद्यकीय तपासणी केली
सूत्रांनी सांगितले की, आरोग्य मंत्रालयाच्या अधिकार्यांनी मिश्रा यांना कोरोना वायरसबाबत रूग्णालये आणि प्रयोगशाळांच्या तयारीसाठी उचलण्यात आलेल्या पावलांची माहिती दिली. पंतप्रधानांच्या मुख्य सचिवांनी नगरी विमान उड्डाण मंत्रालयासह विविध मंत्रालयांद्वारे करण्यात आलेल्या कामांचाही आढावा घेतला. अधिकार्यांनी मिश्रा यांना सांगितले की, स्थितीवर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे अन्य मंत्रालये, राज्य सरकार आणि केंद्रशासीत प्रदेशांच्या प्रशासनाद्वारे सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. आतापर्यंत सात अंतरराष्ट्रीय विमानतळांवर 115 उड्डाणांमधील 20 हजार लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
डॉक्टरांना माहिती देण्याचे आवाहन
हर्षवर्धन यांनी सांगितले की, त्यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून राज्यांच्या तयारीचा आढावा घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी 1 जानेवारी 2020 नंतर चीनचा प्रवास करणार्यांना ताप, कफ, श्वाससंबंधीचा त्रास झाल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार करणार्या डॉक्टरांना आपल्याबाबत माहिती देण्याचे आवाहन केले आहे. यात म्हटले आहे की, चीनमध्ये रहात असताना कोणाला ताप आला, कफ असेल तर खोकताना आणि शिंकताना तोंड झाकून घ्या, तसेच ताबडतोब उपचार केंद्रात जावे. तसेच चीनमध्ये भारतीय दुतावासशी संपर्क साधावा.
Visit : bhaujannama.com