नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधील कोरोना व्हायरसने आता भारतालाही घेरले असून देशात कोरोनाची तीन नवीन प्रकरणे समोर आली आहेत. कोरोनाने पॉजिटीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या ३४ वर गेली आहे. या नवीन प्रकरणात ओमानहुन परतलेला तामिळनाडूचा एक व्यक्ती कोरोनाने संक्रमित असल्याचे समोर आले आहे. याशिवाय इराणवरून परतलेल्या लडाखच्या दोन जणांना कोरोनाने संक्रमित झाल्याचे समोर आले आहे. अशात देशात सतत कोरोनाची प्रकरणे वाढत चालली असून संक्रमित झालेल्या लोकांचे उपचार सुरु आहेत.
चीनच्या वुहानपासून पसरलेल्या या कोरोना व्हायरसने पूर्ण जगालाच घेरले असून जगभरात कोरोनाची प्रकरणे वेगाने समोर येत आहेत. जगभरात आतापर्यंत ९० हजार पेक्षा अधिक कोरोना व्हायरसने संक्रमित लोकांचे प्रकरण समोर आले आहे. तर तीन हजार लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यूही झाला आहे.
आढावा बैठक –
कोरोना व्हायरसने भारतातही हाहाकार माजला असून सरकार कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी पूर्ण तयारी करत असल्याचे दिसत आहे. तर आज सरकारची कोरोना व्हायरसवर आढावा बैठकही झाली आहे.
दिल्लीत कोरोना व्हायरसवर आज झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयारीची माहिती दिली. यासोबतच केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी मोदींना आतापर्यंत उचललेल्या पाऊलांबद्दल माहिती दिली. तसेच हर्षवर्धन यांनी सांगितले की, देशभरात ५२ प्रयोगशाळांमध्ये नमुन्यांचे परीक्षण केले जात आहे.