नवी दिल्ली : वृत्त संस्था – V. K. Saraswat. नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांनी म्हटले भारताने कोविड-19 च्या लाटेचा सामना खुप चांगल्याप्रकारे केला आणि यासाठी संसर्गाची नवीन प्रकरणे कमी झाली आहेत. सोबतच त्यांनी या गोष्टीवर जोर दिला की, तिसर्या लाटे (Corona Third Wave) चा सामना करण्यासाठी सुद्धा तयारी पूर्ण झाली पाहिजे, तिसर्या लाटे (Corona Third Wave) मुळे लहान मुले आणि तरूण लोकसंख्येला धोका आहे असे व्ही. के. सारस्वत ( V. K. Saraswat. ) यांनी म्हटले.
तिसर्या लाटेचे स्पष्ट संकेत
सारस्वत म्हणाले, भारतातील महामारी तज्ज्ञांनी खुपच स्पष्ट संकेत दिले आहेत.
कोविड-19 च्या तिसर्या लाटेची शक्यता आहे आणि ती सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. यासाठी देशाने जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण केले पाहिजे.
दुसर्या लाटेचा सामना चांगला केला
सारस्वत यांनी म्हटले की, मला वाटते आम्ही खुप चांगले काम केले आहे.
आम्ही कोविड-19 च्या दुसर्या लाटेचा सामना चांगल्या प्रकारे केला आणि त्याच्याच परिणाम म्हणून संसार्गाची प्रकरणे खुप कमी होत आहेत.
आमच्या वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान व्यवस्थेची मदत, ऑक्सीजन बँक बनवणे, मोठ्या संख्ये ऑक्सीजन पुरवठ्यासाठ उद्योग स्थापन करणे, आम्ही महामारीला तोंड देण्यात यशस्वी ठरलो.
रेल्वे, विमानतळ, सैन्य दलाचा वापर द्रव ऑक्सीजन आणण्यासाठी केला जात आहे.
कृपया हे देखील वाचा:
पीएमपी संचालक राजीनामा नाट्याचा पुढील अंक ‘पोलिस ठाण्यात’ ! भाजपच्या कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘हल्ला’
मोठी कारवाई ! वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह 8 पोलीस तडकाफडकी निलंबित, राज्य पोलीस दलात प्रचंड खळबळ
आज सौभाग्य योग, 6 राशींची चांदी, होईल भरपुर लाभ, इतरांसाठी असा आहे शनिवार